शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

CAA काय आहे? आमच्या मुलांच्या नोकऱ्या पाकिस्तानींना देणार, पैसा...; केजरीवालांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 11:03 IST

Arvind Kejariwal On CAA Video: काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. - केजरीवाल

केंद्र सरकारने देशात सीएए कायदा लागू केला आहे. यानुसार पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. यावरून विरोधकांनी सीएए कायद्याला विरोध सुरु केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीएए कायद्यामुळे काय होऊ शकते, यावर मुद्दे मांडताना भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. म्हणजे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक आणले जातील. त्यांना नोकऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्यासाठी घरे बांधली जातील. भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही पण त्यांना पाकिस्तानातील मुलांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. देशातील बरेच लोक बेघर आहेत पण भाजपला पाकिस्तानातून आलेल्या लोकांना इथे घरे बांधून द्यायची आहेत. आमचा रोजगार त्यांच्या मुलांना द्यायचा आहे. त्यांना आमच्या घरात पाकिस्तानी वसवायचे आहेत. भारत सरकारचा जो पैसा आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे तो पाकिस्तानी लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी वापरला जाणार आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

भारतात आधीच खूप गरिबी आहे, मग या गरीब देशांतील गरीब लोकांना आमंत्रित करून भाजपला भारतात गरिबी का वाढवायची आहे? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. सरकारी पैसा पाकिस्तानी लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी वापरला जाईल. या तीन देशांमध्ये अंदाजे 2.5 ते 3 कोटी अल्पसंख्याक आहेत. एकदा भारताने आपले दरवाजे उघडले की या देशांमधून बरेच लोक भारतात येतील. या निर्वासितांना रोजगार कोण देणार? हे का केले जात आहे? काही लोक म्हणतात की हा फक्त व्होट बँकेच्या राजकारणाचा एक भाग आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. 

भाजपने पाकिस्तानी आणि बांगलादेशी रहिवाशांसाठी भारताचे दरवाजे उघडले आहेत. हे देशासाठी धोकादायक आहे. ईशान्येकडील राज्यांना - विशेषत: आसामला - त्याची किंमत मोजावी लागेल. बांगलादेशातून आलेल्या अवैध स्थलांतरितांमुळे आसामची संस्कृती धोक्यात आली आहे. भाजपला या अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व द्यायचे आहे. (आसामचे मुख्यमंत्री) हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा