शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

CAA काय आहे? आमच्या मुलांच्या नोकऱ्या पाकिस्तानींना देणार, पैसा...; केजरीवालांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 11:03 IST

Arvind Kejariwal On CAA Video: काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. - केजरीवाल

केंद्र सरकारने देशात सीएए कायदा लागू केला आहे. यानुसार पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. यावरून विरोधकांनी सीएए कायद्याला विरोध सुरु केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीएए कायद्यामुळे काय होऊ शकते, यावर मुद्दे मांडताना भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. म्हणजे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक आणले जातील. त्यांना नोकऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्यासाठी घरे बांधली जातील. भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही पण त्यांना पाकिस्तानातील मुलांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. देशातील बरेच लोक बेघर आहेत पण भाजपला पाकिस्तानातून आलेल्या लोकांना इथे घरे बांधून द्यायची आहेत. आमचा रोजगार त्यांच्या मुलांना द्यायचा आहे. त्यांना आमच्या घरात पाकिस्तानी वसवायचे आहेत. भारत सरकारचा जो पैसा आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे तो पाकिस्तानी लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी वापरला जाणार आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

भारतात आधीच खूप गरिबी आहे, मग या गरीब देशांतील गरीब लोकांना आमंत्रित करून भाजपला भारतात गरिबी का वाढवायची आहे? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. सरकारी पैसा पाकिस्तानी लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी वापरला जाईल. या तीन देशांमध्ये अंदाजे 2.5 ते 3 कोटी अल्पसंख्याक आहेत. एकदा भारताने आपले दरवाजे उघडले की या देशांमधून बरेच लोक भारतात येतील. या निर्वासितांना रोजगार कोण देणार? हे का केले जात आहे? काही लोक म्हणतात की हा फक्त व्होट बँकेच्या राजकारणाचा एक भाग आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. 

भाजपने पाकिस्तानी आणि बांगलादेशी रहिवाशांसाठी भारताचे दरवाजे उघडले आहेत. हे देशासाठी धोकादायक आहे. ईशान्येकडील राज्यांना - विशेषत: आसामला - त्याची किंमत मोजावी लागेल. बांगलादेशातून आलेल्या अवैध स्थलांतरितांमुळे आसामची संस्कृती धोक्यात आली आहे. भाजपला या अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व द्यायचे आहे. (आसामचे मुख्यमंत्री) हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा