शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

CAA काय आहे? आमच्या मुलांच्या नोकऱ्या पाकिस्तानींना देणार, पैसा...; केजरीवालांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 11:03 IST

Arvind Kejariwal On CAA Video: काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. - केजरीवाल

केंद्र सरकारने देशात सीएए कायदा लागू केला आहे. यानुसार पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. यावरून विरोधकांनी सीएए कायद्याला विरोध सुरु केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीएए कायद्यामुळे काय होऊ शकते, यावर मुद्दे मांडताना भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. म्हणजे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक आणले जातील. त्यांना नोकऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्यासाठी घरे बांधली जातील. भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही पण त्यांना पाकिस्तानातील मुलांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. देशातील बरेच लोक बेघर आहेत पण भाजपला पाकिस्तानातून आलेल्या लोकांना इथे घरे बांधून द्यायची आहेत. आमचा रोजगार त्यांच्या मुलांना द्यायचा आहे. त्यांना आमच्या घरात पाकिस्तानी वसवायचे आहेत. भारत सरकारचा जो पैसा आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे तो पाकिस्तानी लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी वापरला जाणार आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

भारतात आधीच खूप गरिबी आहे, मग या गरीब देशांतील गरीब लोकांना आमंत्रित करून भाजपला भारतात गरिबी का वाढवायची आहे? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. सरकारी पैसा पाकिस्तानी लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी वापरला जाईल. या तीन देशांमध्ये अंदाजे 2.5 ते 3 कोटी अल्पसंख्याक आहेत. एकदा भारताने आपले दरवाजे उघडले की या देशांमधून बरेच लोक भारतात येतील. या निर्वासितांना रोजगार कोण देणार? हे का केले जात आहे? काही लोक म्हणतात की हा फक्त व्होट बँकेच्या राजकारणाचा एक भाग आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. 

भाजपने पाकिस्तानी आणि बांगलादेशी रहिवाशांसाठी भारताचे दरवाजे उघडले आहेत. हे देशासाठी धोकादायक आहे. ईशान्येकडील राज्यांना - विशेषत: आसामला - त्याची किंमत मोजावी लागेल. बांगलादेशातून आलेल्या अवैध स्थलांतरितांमुळे आसामची संस्कृती धोक्यात आली आहे. भाजपला या अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व द्यायचे आहे. (आसामचे मुख्यमंत्री) हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा