शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

काय हे! यज्ञ प्रदूषण मुक्तीच्या नावाने... जाळणार 50 हजार किलो लाकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 15:42 IST

वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे.

मेरठ: काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या नादात मूळ उद्दिष्टालाच कसा हरताळ फासला जातो, याचे प्रत्यंतर नुकतेच मेरठमध्ये आले. याठिकाणी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या उत्साहात यंदा प्रदूषण मुक्तीसाठी विशेष यज्ञ करण्यात येणार आहे. मात्र, यामधील हास्यास्पद बाब म्हणजे आयोजकांकडून या यज्ञासाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 50 हजार किलो लाकूड समिधा म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हा यज्ञ प्रदूषण मुक्तीसाठी आहे की अधिक प्रदूषण करण्यासाठी आहे, असा प्रश्न काहीजणांकडून विचारण्यात येत आहे. सध्याच्या घडीला देशातील प्रमुख शहरांमध्ये होणारे प्रदूषण ही चिंतेची बाब आहे.  त्यासाठी मेरठच्या श्री अयुतचंडी महायज्ञ समितीकडून प्रदूषण मुक्तीच्या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे. यासाठी एका मोठ्या मंडपात अनेक यज्ञकुंडे तयार करण्यात आली आहेत. साहजिकच या यज्ञासाठी मोठ्याप्रमाणावर समिधा लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी आंब्याच्या झाडाची तब्बल 500 किलो लाकडं या ठिकाणी आणण्यात आली आहेत. प्रदूषण मुक्तीच्या नावाने करण्यात येणाऱ्या या यज्ञामुळे मोठ्याप्रमाणावर हवेचे प्रदूषण होऊ शकते, ही बाब आयोजकांच्या लक्षातच आलेली नाही. यामुळे आता सोशल मीडियावरून या यज्ञाच्या आयोजकांवर टीका व्हायला सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी 'लॅन्सेट'ने जाहीर केलेल्या अहवालात, भारतातील वाढते वायू प्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यामुळे दिल्लीकरांचे जगणे मुश्कील झाले होते. त्यामुळे मेरठमधील हा यज्ञ म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर, अशी अवस्था असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणUttar Pradeshउत्तर प्रदेश