शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

काय हे! यज्ञ प्रदूषण मुक्तीच्या नावाने... जाळणार 50 हजार किलो लाकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 15:42 IST

वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे.

मेरठ: काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या नादात मूळ उद्दिष्टालाच कसा हरताळ फासला जातो, याचे प्रत्यंतर नुकतेच मेरठमध्ये आले. याठिकाणी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या उत्साहात यंदा प्रदूषण मुक्तीसाठी विशेष यज्ञ करण्यात येणार आहे. मात्र, यामधील हास्यास्पद बाब म्हणजे आयोजकांकडून या यज्ञासाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 50 हजार किलो लाकूड समिधा म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हा यज्ञ प्रदूषण मुक्तीसाठी आहे की अधिक प्रदूषण करण्यासाठी आहे, असा प्रश्न काहीजणांकडून विचारण्यात येत आहे. सध्याच्या घडीला देशातील प्रमुख शहरांमध्ये होणारे प्रदूषण ही चिंतेची बाब आहे.  त्यासाठी मेरठच्या श्री अयुतचंडी महायज्ञ समितीकडून प्रदूषण मुक्तीच्या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे. यासाठी एका मोठ्या मंडपात अनेक यज्ञकुंडे तयार करण्यात आली आहेत. साहजिकच या यज्ञासाठी मोठ्याप्रमाणावर समिधा लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी आंब्याच्या झाडाची तब्बल 500 किलो लाकडं या ठिकाणी आणण्यात आली आहेत. प्रदूषण मुक्तीच्या नावाने करण्यात येणाऱ्या या यज्ञामुळे मोठ्याप्रमाणावर हवेचे प्रदूषण होऊ शकते, ही बाब आयोजकांच्या लक्षातच आलेली नाही. यामुळे आता सोशल मीडियावरून या यज्ञाच्या आयोजकांवर टीका व्हायला सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी 'लॅन्सेट'ने जाहीर केलेल्या अहवालात, भारतातील वाढते वायू प्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यामुळे दिल्लीकरांचे जगणे मुश्कील झाले होते. त्यामुळे मेरठमधील हा यज्ञ म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर, अशी अवस्था असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणUttar Pradeshउत्तर प्रदेश