त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 09:02 AM2017-10-12T09:02:53+5:302017-10-12T09:36:06+5:30

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे.

What happened in the L-32 bungalow in Jalaiyu Vihar that night? Arushi-Hemraj murder case will come today | त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

Next
ठळक मुद्देराजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत.आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती.

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडिल राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णया विरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे. 

राजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत. न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठाने सात सप्टेंबरला निर्णय राखून ठेवला होता. आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 

तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले असले तरी, अजूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे. उच्च न्यायालय निकाल सुनावताना या दोन्ही हत्या का झाल्या? त्यामागे काय उद्देश होता? त्याबद्दल निरीक्षण नोंदवू शकते. 

एकूणच या दोन्ही हत्यांभोवती रहस्य असल्याने प्रसारमाध्यमांनी त्यावेळी हे प्रकरण उचलून धरले होते. एक प्रकारची मीडिया ट्रायल सुरु असल्याने पोलिसांवर दबाव होता. उत्तरप्रदेश पोलिसांनी ऑनर किलिंगमधून या दोन्ही हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. अखेर तत्कालिन मुख्यमंत्री मायावतींनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले. 

या प्रकरणाच्या तपासात अनेक नाटयमय वळणे आली. सीबीआयच्या दोन प्रमुख अधिका-यांनी परस्परविरुद्ध निष्कर्ष काढला. अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला. तलवार यांचा कम्पाऊंडर क्रिष्णा, शेजारच्या बंगल्यात काम करणारे दोन नोकर विजय मंडल आणि राजकुमार यांना अटक केली. त्यांची नार्को चाचणी केली. पण सीबीआयला तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करता न आल्याने त्यांची सुटका झाली. 

दुस-या टीमला आरुषीच्या आई-वडिलांवर संशय होता. पण सबळ पुराव्याअभावी त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला. 

Web Title: What happened in the L-32 bungalow in Jalaiyu Vihar that night? Arushi-Hemraj murder case will come today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.