शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

'अग्निशमन'ला सतावणारे नेमके दुखणे आहे तरी काय? मोठी दुर्घटना, तात्पुरती चर्चा आणि अंमलबजावणी शून्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 08:26 IST

गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीनंतर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पब आणि रेस्टॉरंटच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रताप करगुप्पीकरनिवृत्त मुख्य अग्निशमन दल प्रमुख, मुंबई महापालिका

गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीनंतर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पब आणि रेस्टॉरंटच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोअर परळच्या कमला मिल येथील पबला काही वर्षांपूर्वी भीषण आग लागली होती. त्यानंतर पबमध्ये जाण्याचे, सुटकेचे मार्ग कसे असावेत, त्याचे निकष आखून दिले आहेत. हे निकष पाळले जातात का? नसतील तर आतापर्यंत किती पब किंवा रेस्टॉरंटवर कारवाई झाली, हे गुलदस्त्यातच आहे. दोन वर्षांपूर्वी गोरेगावच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागली होती. ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधली होती. त्यानंतर अशा योजनेत बांधलेल्या इमारतींना बाहेरून आणखी एक जिना असावा असा नियम करण्यात आला; परंतु आतापर्यंत किती इमारतींमध्ये अशा प्रकारचे जिने बांधले गेले? हा प्रश्नच आहे.

मुंबईचा आवाका लक्षात घेता मुंबई अग्निशमन दल पूर्ण ताकदीने काम करत आहे यात शंका नाही. एका बाजूला दल सक्षम करण्याचे प्रयत्न होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आगीच्या वाढत्या घटना, उत्तुंग टॉवर, अनधिकृत गोदात लागणाऱ्या आगी पाहता अग्निसुरक्षेचे नियम पाळले जातात का? ते पाळले जात आहेत की नाही, याची दलाकडून वेळच्या वेळी तपासणी होते की नाही? असे प्रश्न निर्माण होतात.

अग्निसुरक्षेचे नियम स्पष्ट आहेत. ना हरकत प्रमाणपत्र कधी घ्यावे, नूतनीकरण कधी करावे हेही स्पष्ट आहे. मात्र, एखाद्या आस्थापनाने किंवा सोसायटीने एनओसी घेतली किंवा नूतनीकरण केले तर तेथे जाऊन खातरजमा केली जाते का? मुंबईची लोकसंख्या पाहता आणि अग्निशमन दलाकडील मनुष्यबळ पाहता प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी कशी होणार, हा मुख्य प्रश्न आहे. तपासणीसाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ नसणे, बदलते सरकारी नियम, मोठी आग लागली की तेवढ्यापुरती होणारी चर्चा, मात्र भविष्यातील कठोर उपाय आणि त्यांची अंमलबजावणी न होणे ही आपली दुखरी नस आहे.

सरकारी नियमात होणारे बदल हा एक अडचणीचा प्रश्न ठरू लागला आहे. कोणतीही इमारत उभी राहिली की त्याच्या आसपास किती मोकळी जागा असावी, याचे नियम आहेत. आगीसारखी दुर्घटना घडली तर अग्निशामन दलाच्या वाहनांना त्या इमारतीच्या चौफेर बाजूने प्रवेश करता यावा यासाठी मोकळ्या जागेची गरज असते; परंतु पुनर्विकास झालेल्या इमारतींची मोकळी जागा अनेकदा विकासकाने ग्राहकांना फसवून किंवा नियमबाह्य पद्धतीने पार्किंगसाठी दिलेली असते.

आग लागली की नियम बदलले जातात; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. यामुळे कशाच्या बाबतीत एकवाक्यता राहत नाही आणि दुर्घटनांचे सत्र सुरूच राहते. चौकशी होते, अहवाल येतात; पण कालांतराने त्याचे काय होते, हे कळत नाही. आगीच्या प्रकरणात आज अंदाजे २०० खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. ते निकाली निघावेत म्हणून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire safety lapses: Big accidents, fleeting talk, zero implementation!

Web Summary : Mumbai's fire safety faces challenges: inadequate staffing, rule changes, and lack of enforcement. Despite clear regulations, inspections are lacking. Post-disaster rule changes often lack consistent implementation, leading to recurring incidents and pending court cases.
टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलgoaगोवाMumbaiमुंबईfireआग