शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 15:25 IST

फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गांधी आणि नेहरु परिवारावर टीका करण्यात घालवतात. नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबावर केंद्रीत असते. फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीकरीमध्ये प्रियंकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. फतेहपूर सीकरीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी बोलत होत्या. 

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले तर 50 टक्के भाषण नेहरुंनी हे केल, इंदिरा गांधींनी ते केलं. मात्र भाजपाच्या 5 वर्षात सत्तेच्या काळात मोदी सरकारने काय केलं हे सांगत नाही असा टोला प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचार केला जात आहे. उत्तर प्रदेशातील 13 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान पार पडेल. यामध्ये खीरी, शाहजहापूर, हरदोई, कानपूर, कन्नोज यासारख्या मतदारसंघाचा समावेश आहे. 

प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य करत आहेत. इतकचं नाही तर वाराणसी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अद्याप काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र जर पक्षाने तिकीट दिलं तर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी तयार आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात आहे. 

प्रियंका गांधी यांना काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची निवड झाल्यानंतर त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशातील मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेव्हापासून प्रियंका गांधी या अनेक प्रचार रॅली, गंगा यात्रा अशा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करत आहे. फतेहपूर जिल्ह्यात येण्यापूर्वी प्रियंका गांधी ह्या राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर होत्या. याठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलून निवडणूक प्रचाराचा आढावा प्रियंका गांधी यांनी घेतला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी