शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

५०० वर्षांपूर्वी बाबरनं जे केलं, तेच आज संभलमध्ये घडतंय... योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:33 IST

CM Yogi Adityanath in Ayodhya : लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

CM Yogi Adityanath in Ayodhya : अयोध्या : अयोध्येत ४३ व्या रामायण मेळाव्याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यना यांनी विरोधकांवर तसेच राज्याचे वातावरण बिघडवत असलेल्या घटकांवर जोरदार हल्लाबोल केला. जे काम बाबरच्या एका सेनापतीने ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत केले होते, तेच काम आज संभल आणि शेजारील बांगलादेशात केले जात आहे. त्या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

आजही समाजाच्या जडणघडणीला तडा देणारे लोक येथे उभे आहेत. सामाजिक एकात्मता भंग करून आम्हा लोकांमध्ये फूट पाडण्याची पूर्ण व्यवस्थाही करत आहोत. लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

संभल आणि बांगलादेशमध्ये जे काही घडत आहे, त्या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभल हिंसाचार प्रकरणावरून संताप व्यक्त केला. तसेच, भगवान श्रीरामांनी समाज आणि भारत यांना जोडण्याचे काम केले. अयोध्या हे भगवान रामप्रती भारताच्या भक्तीचे प्रतीक आहे. प्रभू राम आणि जानकी यांच्याबद्दल ज्यांच्या मनात श्रद्धा नाही, त्यांचा कट्टर शत्रूप्रमाणे त्याग केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा उल्लेख रामायण मेळा १९८२ मध्ये सुरू झाला. त्याआधी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी देशाच्या विविध भागात रामायण मेळावे सुरू केले होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म याच अयोध्येत आणि आजच्या आंबेडकर नगरीत झाला. ते खूप शिकलेले होते, मात्र मंदिरात जात नव्हते. समाजवादी विचारवंत होते. त्यांनी म्हटले होते की, राम, कृष्ण आणि महादेव या तीन देवांवर जोपर्यंत भारताची श्रद्धा आहे, तोपर्यंत देशाचे कोणीही काहीही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याBangladeshबांगलादेशChief Ministerमुख्यमंत्री