शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

महिला आरक्षण अडथळे काय?; राजकीय निरीक्षकांना वाटतेय चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:54 IST

२०११ साली फेब्रुवारी-मार्च महिन्यात जनगणना पार पाडण्यात आली होती. त्याची आकडेवारी त्या वर्षीच्या ३१ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केले तरीही देशभरातील किमान ५० टक्के विधानसभांनी या आरक्षणाला मंजुरी देणे आवश्यक आहे. महिला आरक्षण हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने हे पाऊल महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या ८२व्या कलमात २००२मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यात म्हटले आहे की २०२६नंतरच्या जनगणनेतील आकड्यांवर मतदारसंघांची पुनर्रचना करावी. ही जनगणना २०३१साली होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकेल. 

२०२१ साली होणारी जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. महिलांना ३३ टक्के आरक्षण ही संकल्पना २०२९पूर्वी प्रत्यक्षात साकारायची असेल तर केंद्र सरकारला त्या दिशेने जलद पावले उचलावी लागतील. २०११ साली फेब्रुवारी-मार्च महिन्यात जनगणना पार पाडण्यात आली होती. त्याची आकडेवारी त्या वर्षीच्या ३१ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अनेक राज्यांत जनगणना करण्यासाठी मागणी करण्यात येत असताना अद्याप त्याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

महिलांना आरक्षण दिले तरीही खरी सत्ता त्यांचा पती, वडील किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हातात राहते. ग्रामपंचायत स्तरावर हे चित्र सर्रास दिसून येते. त्याची पुनरावृत्ती संसदेत, विधानसभेत तर होणार नाही ना याची राजकीय निरीक्षकांना चिंता वाटत आहे.

टॅग्स :ParliamentसंसदWomen Reservationमहिला आरक्षण