शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 22:50 IST

ममतांनी आरोप केला की, केंद्रीय तपास संस्था टीएमसी नेत्यांना धमकावून भाजपमध्ये सामील होण्याचा दबाव टाकत आहेत.

West Bengal Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभा घेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज पुरुलियामध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ईडी आणि इनकम टॅक्स भाजपचे फंडिंग बॉक्स आहेत. आमच्याकडे लक्ष्मी भंडार आहे, तर त्यांच्याकडे ईडी आणि सीबीआय भंडार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा टीएमसी नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्यास किंवा कारवाईला सामोरे जाण्याच्या धमक्या देतात. ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयकर विभाग भाजपचे हत्यार म्हणून काम करत असल्याचा आरोप ममतांनी यावेळी केला.

रामनवमीला भाजप दंगली घडवतील...ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, 17 एप्रिल रोजी रामनवमीला भाजप जातीय दंगे भडकावण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रभू रामाने दंगली भडकवायला सांगितले नव्हते, पण भाजपवाले तोच प्रयत्न करतील. जनतेने कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन ममतांनी केले. तसेच, लोक सरकारविरोधात आंदोलन करतात, तेव्हा एनआयएला पाठवले जाते. रात्री उशिरा महिला जेव्हा घरात एकट्या असतात, तेव्हा स्थानिक पोलिसांना न कळवता भाजप एनआयए अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी पाठवते, असा आरोपही त्यांनी केला.

बंगालमध्ये इंडिया आघाडी नाहीबंगालमध्ये इंडिया आघाडी नसल्याचेही ममतांनी स्पष्ट सांगितले. बंगालमध्ये सीपीआय(एम)-काँग्रेस-भाजप एकत्र लढत आहेत, आम्ही त्यांच्या युतीविरोधात लढत आहोत. आपल्याला टीएमसी आणखी बळकट केली पाहिजे. असे झाले नाही, तर आपल्याला माहीत आहे की, भारताचे अस्तित्व संपुष्टात येईल. आता भाजपने समान नागरी कायदा आणला, CAA देखील आणला, यामुळे लोक बेघर होतील आणि त्यांचे नागरिकत्व धोक्यात येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सBJPभाजपा