शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'बंगालमध्ये हिंसाचाराने जनता त्रस्त, आता होतेय खरे परिवर्तन', भाजपत प्रवेश करताच त्रिवेदींचा ममतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 15:00 IST

"यापूर्वी मी ज्या पक्षात होतो, तेथे केवळ एका कुटुंबाचीच सेवा होत होती. जनतेची नाही. आज बंगालमध्ये अशी परिस्थिती आहे, की तेथील जनता मला फोन करून म्हणते, की आपण या पक्षात काय करत आहात." (Dinesh trivedi joins bjp)

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापले आहे. यातच भारतीय जनता पक्ष (BJP) सातत्याने आपली ताकद वाढवतो आहे. भाजप सात्याने विरोधी पक्षाच्या किल्ल्याला सुरूंग लावताना दिसत आहे आणि विरोधी पक्षातील नेतेही भाजपत डेरे दाखल होत आहेत. यातच भाजपला आज (शनिवारी) आणखी एक मोठे यश मिळाले. नुकतेच पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला बाय-बाय करणारे माजी कंद्रीयमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh trivedi) यांनी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात भाजपचे कमळ हाती घेतले आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda), केंद्रीयमंत्री पीयूष गोयल आणि धर्मेन्द्र प्रधान उपस्थित होते. (Dinesh trivedi joins bjp in presence with party national president jp nadda)

ममता बॅनर्जींना अजून एक धक्का, आखणी एका मोठ्या नेत्याने केला भाजपात प्रवेश

भाजपत येणे हा एक सुवर्ण क्षण -यावेळी, भाजपत येणे हा एक सुवर्ण क्षण असल्याचे म्हणत दिनेश त्रिवेदी यांनी बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला. त्रिवेदी म्हणाले, “आज तो स्वर्णक्षण आहे, ज्याची मी वाट पाहात होतो. जनता सर्वोपरी आहे, म्हणून आज आपण सार्वजनिक जिवनात आहोत. एक राजकीय पक्ष असा असतो, ज्यात कुटुंब सर्वोपरी असते. आज मी खऱ्या अर्थाने जनतेच्या कुटुंबात सामील झालो आहे. याचा होतू जनतेची सेवा आहे.” 

तेथे केवळ एका कुटुंबाचीच सेवा होते -यापूर्वी मी ज्या पक्षात होतो, तेथे केवळ एका कुटुंबाचीच सेवा होत होती. जनतेची नाही. आज बंगालमध्ये अशी परिस्थिती आहे, की तेथील जनता मला फोन करून म्हणते, की आपण या पक्षात काय करत आहात. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की एखादी शाळा बांधण्यासाठीही लाच द्यावी लागते. बंगालमध्ये सातत्याने हिंसाचार वाढत आहे. येथील जनता हिंसाचार आणि भ्रष्टाचाराने त्रस्त झाली आहे. मात्र, आता परिवर्तन होत असल्याने बंगालमधील जनात आनंदात आहे, असेही दिनेश त्रिवेदी म्हणाले.

"...तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करूशकतात भाजपशी हात मिळवणी"; मोठ्या नेत्याचा दावा!

दोन वेळा लोकसभा तर 3 वेळा राज्यसेभेचे खासदार -दिनेश त्रिवेदी यांनी 12 फेब्रुवारीला टीएमसीचा राजीनामा दिला होता. ते 2011 ते 2012 पर्यंत रेल्वे मंत्री होते. ते दोन वेळा लोकसभा तर 3 वेळा राज्यसेभेचे खासदार राहिले आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदाच बेरकपूर मधून खासदार झाले होते.

ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?

 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा