शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भाजपाचे अच्छे दिन संपले; त्यांची एक्स्पायरी डेट जवळ आली- ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:19 IST

महारॅलीच्या व्यासपीठावरुन ममता बॅनर्जींचं मोदी सरकारवर शरसंधान

कोलकाता: मोदी सरकारचे अच्छे दिन यापुढे येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट आता जवळ आली आहे, अशा शब्दांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीभाजपावर निशाणा साधला. मोदी सरकारच्या विरोधात आज तृणमूल काँग्रेसनं कोलकात्यात महारॅलीचं आयोजन केलं. या महारॅलीला 22 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. महारॅलीच्या निमित्तानं आज मंचावर संयुक्त भारताचं उत्तम उदाहरण आहे. लवकरच देशात एक नवी पहाट उगवली, असा विश्वास तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी व्यक्त केला. 'मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. येणाऱ्या काळात आपण एकत्र काम करू. यापुढे भाजपाचे अच्छे दिन येणार नाहीत. त्यांनी कितीही आश्वासनं दिली तरी त्यांचे अच्छे दिन पुन्हा येणार नाहीत,' अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर शरसंधान साधलं.येणाऱ्या काळात विरोधकांनी एकजूट दाखवावी. जिथे जो पक्ष मजबूत असेल, तिथे इतर पक्षांनी त्याला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिला. भाजपा पश्चिम बंगालमध्ये यशस्वी होणार नाही. त्यांना फक्त भोपळाच असेल, असा टोला बॅनर्जींनी लगावला. मोदींनी देशातील सर्व संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांना वाटतं फक्त तेच प्रामाणिक आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात महाआघाडी त्यांच्यासमोर आव्हान उभं करेल, असं त्यांनी महारॅलीला संबोधित करताना म्हटलं.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा