शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपाचे अच्छे दिन संपले; त्यांची एक्स्पायरी डेट जवळ आली- ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:19 IST

महारॅलीच्या व्यासपीठावरुन ममता बॅनर्जींचं मोदी सरकारवर शरसंधान

कोलकाता: मोदी सरकारचे अच्छे दिन यापुढे येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट आता जवळ आली आहे, अशा शब्दांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीभाजपावर निशाणा साधला. मोदी सरकारच्या विरोधात आज तृणमूल काँग्रेसनं कोलकात्यात महारॅलीचं आयोजन केलं. या महारॅलीला 22 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. महारॅलीच्या निमित्तानं आज मंचावर संयुक्त भारताचं उत्तम उदाहरण आहे. लवकरच देशात एक नवी पहाट उगवली, असा विश्वास तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी व्यक्त केला. 'मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. येणाऱ्या काळात आपण एकत्र काम करू. यापुढे भाजपाचे अच्छे दिन येणार नाहीत. त्यांनी कितीही आश्वासनं दिली तरी त्यांचे अच्छे दिन पुन्हा येणार नाहीत,' अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर शरसंधान साधलं.येणाऱ्या काळात विरोधकांनी एकजूट दाखवावी. जिथे जो पक्ष मजबूत असेल, तिथे इतर पक्षांनी त्याला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिला. भाजपा पश्चिम बंगालमध्ये यशस्वी होणार नाही. त्यांना फक्त भोपळाच असेल, असा टोला बॅनर्जींनी लगावला. मोदींनी देशातील सर्व संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांना वाटतं फक्त तेच प्रामाणिक आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात महाआघाडी त्यांच्यासमोर आव्हान उभं करेल, असं त्यांनी महारॅलीला संबोधित करताना म्हटलं.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा