शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ते 40 लाख रहिवासी रोहिंग्या नाहीत, त्यांना देशातून हाकलणार का? संतप्त ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 14:02 IST

आसाममधील नॅशनल सिटीझन रजिस्टरचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या मसुद्यातील यादीमधून तब्बल 40 लाख नागरिकांची नावे वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या ममता बँनर्जी यांनी...

कोलकाता - आसाममधील नॅशनल सिटीझन रजिस्टरचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या मसुद्यातील यादीमधून तब्बल 40 लाख नागरिकांची नावे वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या ममता बँनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ही यादी निष्पक्षपातीपणे तयार करण्यात आल्याच्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी यांनी काही समुदाय आणि भाषिक रहिवाशांना जबरदस्तीने निशाणा बनवण्यात आल्याचा आरोप केला. मसुद्यातून वगळण्यात आलेले 40 लाख रहिवासी हे काही रोहिंग्या नाहीत, त्यांना देशातून हाकलणार का? असा सवालही त्यांनी केला. 

आसाममधील नॅशनल सिटिझन रजिस्टरचा अंतिम मसुदा जाहीर करण्यात आल्यानंतर त्यावर आक्षेप घेताना ममत बॅनर्जी म्हणाल्या, काही जणांकडे आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे. मात्र यादीत नाव नाही आहे. काही जणांची नावे या यादीतून हेतुपुरस्पर हटवण्यात आली आहेत. या रहिवाशांना देशातून जबरदस्तीने हाकलून देण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. 

आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यातील यादीत राज्यातील 2 कोटी 89 लाख रहिवाशांना नागरिकत्वासाठी योग्य मानण्यात आले आहे. तर 40 लाख रहिवाशांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली आहेत.  एकूण 3 कोटी 29 लाख 91 हजार 380 रहिवाशांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 2 कोटी, 89 लाख, 38 हजार 677 रहिवाशी नागरिकत्वासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले. तर सुमारे 40 लाख रहिवाशी अवैधपणे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची नावे या मसुद्यातून वगळण्यात आली आहेत. 

 

 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारणRajnath Singhराजनाथ सिंहAssamआसाम