शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

ते 40 लाख रहिवासी रोहिंग्या नाहीत, त्यांना देशातून हाकलणार का? संतप्त ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 14:02 IST

आसाममधील नॅशनल सिटीझन रजिस्टरचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या मसुद्यातील यादीमधून तब्बल 40 लाख नागरिकांची नावे वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या ममता बँनर्जी यांनी...

कोलकाता - आसाममधील नॅशनल सिटीझन रजिस्टरचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या मसुद्यातील यादीमधून तब्बल 40 लाख नागरिकांची नावे वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या ममता बँनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ही यादी निष्पक्षपातीपणे तयार करण्यात आल्याच्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी यांनी काही समुदाय आणि भाषिक रहिवाशांना जबरदस्तीने निशाणा बनवण्यात आल्याचा आरोप केला. मसुद्यातून वगळण्यात आलेले 40 लाख रहिवासी हे काही रोहिंग्या नाहीत, त्यांना देशातून हाकलणार का? असा सवालही त्यांनी केला. 

आसाममधील नॅशनल सिटिझन रजिस्टरचा अंतिम मसुदा जाहीर करण्यात आल्यानंतर त्यावर आक्षेप घेताना ममत बॅनर्जी म्हणाल्या, काही जणांकडे आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे. मात्र यादीत नाव नाही आहे. काही जणांची नावे या यादीतून हेतुपुरस्पर हटवण्यात आली आहेत. या रहिवाशांना देशातून जबरदस्तीने हाकलून देण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. 

आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यातील यादीत राज्यातील 2 कोटी 89 लाख रहिवाशांना नागरिकत्वासाठी योग्य मानण्यात आले आहे. तर 40 लाख रहिवाशांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली आहेत.  एकूण 3 कोटी 29 लाख 91 हजार 380 रहिवाशांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 2 कोटी, 89 लाख, 38 हजार 677 रहिवाशी नागरिकत्वासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले. तर सुमारे 40 लाख रहिवाशी अवैधपणे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची नावे या मसुद्यातून वगळण्यात आली आहेत. 

 

 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारणRajnath Singhराजनाथ सिंहAssamआसाम