शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मिरवणुकीवर हल्ला आणि बॉम्बफेक; तृणमूलवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 20:56 IST

West Bengal: कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुचीमध्ये पोलिसांसमोर भाजपच्या मिरवणुकीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

कूचबिहार:पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील सेटलकुचीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मिरवणुकीदरम्यान हल्ला आणि बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने (TMC) केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 13 सप्टेंबरच्या भाजपच्या 'नबन चलो' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सीतालकुचीमध्ये 'चोर धरो, जेल भरो' मिरवणूक काढण्यात आली. याच मिरवणुकीवर हल्ला झाला. मात्र, तृणमूलने बॉम्बस्फोटाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप पूर्वघोषित कार्यक्रमासाठी रविवारी मिरवणूक काढत होता. 13 सप्टेंबर रोजी होणारी नबन मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे नेते आणि समर्थक मिरवणुकीत घोषणाबाजी करत होते. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तृणमूलने मिरवणुकीवर हल्ला आणि बॉम्बस्फोट केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पोलिस घटनास्थळी हजर असतानाही भाजप कार्यकर्त्यांवर लाठ्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी तणाव वाढला.

सभा बिघडवण्यासाठी तृणमूलने हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर कशी गेली? विधानसभा निवडणुकीच्या वेळीही सेटलकुची चर्चेत होती. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी जमावावर गोळीबार केला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यूही झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. याविरोधात ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका