शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

भवानीपूरमध्ये ममतांना मोठी टक्कर; भाजपनं तब्बल 80 नेत्यांना उतरवलं मैदानात; TMC नंही झोकली संपूर्ण ताकद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 10:35 IST

याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या जागेसाठी आज तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. या विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आपल्या समर्थकांसह प्रचारासाठी रस्त्यावर उतरणा आहेत. तर भाजपचे 80 नेते पक्षाच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या प्रचारासाठी 80 ठिकाणी मैदानात उतरणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, प्रदेश भाजप प्रमुख सुकांता मजुमदार, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाच्या नेत्या देबश्री चौधरी हे देखील मैदानात उतरणार आहेत.

याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे.

"मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय ममता बॅनर्जी, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार"

नंदीग्राम मतदार संघात झाला होता ममतांचा पराभव - याचवर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढली होती. यासाठी त्यांनी आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडला होता. मात्र, नंदीग्राममध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी सुवेंदू अधिकारी टीएमसीमध्येच होते.

ममता बॅनर्जींना 5 नोव्हेंबरपर्यंत जिंकून विधानसभेत पोहोचणे आवश्यक -दरम्यान, ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाMLAआमदार