शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 11:00 IST

West Bengal : केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखल, अहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश

ठळक मुद्देकेंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखलअहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष आणि असामाजिक घटक यांच्यात हिंसाचाराच्या बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात हिंसाचार होत असल्याचं समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) लोकांकडून हा हिंसाचार सुरू असल्याचा आरोप भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह वर्मा यांनी केला आहे. "तृणमूल काँग्रेसच्या विजयांनंतर पक्षाच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली," असं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी तृणमूल कांग्रेसला इशारा देत तुमच्या खासदारांना, मुख्यमंत्री आणि आमदारांनाही दिल्लीलादेखील यायचं आहे, असं म्हटलं.पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह यांनी ट्वीट करून तृणमूल काँग्रेसवर टीका केली. "टीएमसीच्या गुंडांनी निवडणुका जिंकताच आमच्या कार्यकर्त्यांचे प्राण घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या, घराला आग लावत आहेत. लक्षात ठेवा, तृणमूल काँग्रेसचे खासदार, मुख्यमंत्री, आमदार यांनाही दिल्ली येथे यावे लागेल. हा इशारा म्हणून समजा. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, खून नव्हे," असंही ते म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखलपश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर रविवारी (२ मे) हुगळीत हिंसाचार झाला होता. अरामबागमधील भाजप कार्यालयालाही काही अज्ञात लोकांनी आग लावली होती. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सतत सुरू असलेल्या राजकीय हिंसाचार आणि ११ जणांच्या मृत्यूनंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने राज्य सरकारला विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करुन राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराचा अहवाल देण्यास सांगितलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसdelhiदिल्लीHome Ministryगृह मंत्रालय