शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election 2021: भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 16:58 IST

West Bengal Election 2021: कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांची बंगालमध्ये सभाममता बॅनर्जी यांच्यावर मोदी यांनी केली टीकागेल्या १० वर्षांचे ममता दीदींनी रिपोर्ट कार्ड द्यावे - पंतप्रधान

सिलीगुडी: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत असताना पुन्हा एकदा पुढील टप्प्यासाठी प्रचारसभांना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, सिलीगुडी येथे त्यांनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावर नाराजी आणि दुःख व्यक्त करत भाजपचा होत असलेला मोठा विजय ममता दीदींना पाहावत नाही. त्यांच्यावर आता कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. (pm narendra modi slams mamata banerjee over coochbehar violence)

कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. कुचबिहार येथे झालेला हिंसाचार दुःखद असून, यामुळे ममता दीदींचा निवडणुकीत विजय होईल, असे नाही. भाजपचा विजय आता ममता बॅनर्जी यांनाही दिसू लागला आहे. मात्र, हिंसाचारामुळे त्या सत्ता राखण्यात यशस्वी होणार नाहीत. त्यांचे स्वतःवरील आणि पक्षावरील नियंत्रण सुटत चालले आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. 

तृणमूलची मनमानी आता चालणार नाही

सत्ता जात असल्याची जाणीव ममता बॅनर्जींना झाली आहे. तृणमूल काँग्रेसची मनमानी आता चालणार नाही. कुचबिहार हिंसाचाराप्रकरणी जबाबदार असलेल्या दोषींवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण बदलण्याची वेळ आली आहे. बंगालमधील नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण, अत्याचार, अन्याय दूर करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

ममता दीदींनी रिपोर्ट कार्ड द्यावे

गेल्या १० वर्षांत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी काय केले, याचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, असे सांगत आता भाजपचे सरकार येण्याचे मन जनतेने बनवले आहे. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिनच्या माध्यमातून बंगाली जनतेला विकास, राज्याचा विकास यांवर अधिकाधिक भर देण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण