शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

West Bengal Election 2021: भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 16:58 IST

West Bengal Election 2021: कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांची बंगालमध्ये सभाममता बॅनर्जी यांच्यावर मोदी यांनी केली टीकागेल्या १० वर्षांचे ममता दीदींनी रिपोर्ट कार्ड द्यावे - पंतप्रधान

सिलीगुडी: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत असताना पुन्हा एकदा पुढील टप्प्यासाठी प्रचारसभांना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, सिलीगुडी येथे त्यांनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावर नाराजी आणि दुःख व्यक्त करत भाजपचा होत असलेला मोठा विजय ममता दीदींना पाहावत नाही. त्यांच्यावर आता कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. (pm narendra modi slams mamata banerjee over coochbehar violence)

कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. कुचबिहार येथे झालेला हिंसाचार दुःखद असून, यामुळे ममता दीदींचा निवडणुकीत विजय होईल, असे नाही. भाजपचा विजय आता ममता बॅनर्जी यांनाही दिसू लागला आहे. मात्र, हिंसाचारामुळे त्या सत्ता राखण्यात यशस्वी होणार नाहीत. त्यांचे स्वतःवरील आणि पक्षावरील नियंत्रण सुटत चालले आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. 

तृणमूलची मनमानी आता चालणार नाही

सत्ता जात असल्याची जाणीव ममता बॅनर्जींना झाली आहे. तृणमूल काँग्रेसची मनमानी आता चालणार नाही. कुचबिहार हिंसाचाराप्रकरणी जबाबदार असलेल्या दोषींवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण बदलण्याची वेळ आली आहे. बंगालमधील नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण, अत्याचार, अन्याय दूर करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

ममता दीदींनी रिपोर्ट कार्ड द्यावे

गेल्या १० वर्षांत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी काय केले, याचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, असे सांगत आता भाजपचे सरकार येण्याचे मन जनतेने बनवले आहे. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिनच्या माध्यमातून बंगाली जनतेला विकास, राज्याचा विकास यांवर अधिकाधिक भर देण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण