शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये ५ व्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान; काही ठिकाणी हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:18 IST

west bengal assembly election 2021: पाचव्या टप्प्यातही मतदारांचा उत्साह दिसून आला.

ठळक मुद्देसायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानबंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनापाचव्या टप्प्यासाठी सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (शनिवारी) मतदान पार पडले. बंगालमधील २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान यापूर्वी पार पडले असून, अद्याप १५९ जागांवर मतदान बाकी आहे. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या दिवशीही हिंसाचाराच्या घटल्याची माहिती मिळाली आहे. (west bengal assembly election 2021 78 percent voter turnout recorded till 5 pm)

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत पार पडलेल्या चारही टप्प्यांमध्ये हिंसाचार घडला. त्यामुळे निवडणूक आयोगाने पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच चारही टप्प्यांत मतदानही भरघोस झाल्याचे पाहायला मिळाले असून, पाचव्या टप्प्यातही मतदारांचा उत्साह दिसून आला. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

बिधाननगर येथील शांतिनगर भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये झटापट झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकीत आठ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर, उत्तर २४ परगनाच्या कामरहाटी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजू बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

कामरहाटी मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १०७ वर भाजप कार्यकर्ता अभिजीत सामंत यांची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पश्चिम बंगामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाच उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील तीन जण तृणमूल काँग्रेसचा, एक रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) तर एक जण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. 

“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.   

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस