शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये ५ व्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान; काही ठिकाणी हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:18 IST

west bengal assembly election 2021: पाचव्या टप्प्यातही मतदारांचा उत्साह दिसून आला.

ठळक मुद्देसायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानबंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनापाचव्या टप्प्यासाठी सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (शनिवारी) मतदान पार पडले. बंगालमधील २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान यापूर्वी पार पडले असून, अद्याप १५९ जागांवर मतदान बाकी आहे. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या दिवशीही हिंसाचाराच्या घटल्याची माहिती मिळाली आहे. (west bengal assembly election 2021 78 percent voter turnout recorded till 5 pm)

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत पार पडलेल्या चारही टप्प्यांमध्ये हिंसाचार घडला. त्यामुळे निवडणूक आयोगाने पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच चारही टप्प्यांत मतदानही भरघोस झाल्याचे पाहायला मिळाले असून, पाचव्या टप्प्यातही मतदारांचा उत्साह दिसून आला. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

बिधाननगर येथील शांतिनगर भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये झटापट झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकीत आठ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर, उत्तर २४ परगनाच्या कामरहाटी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजू बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

कामरहाटी मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १०७ वर भाजप कार्यकर्ता अभिजीत सामंत यांची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पश्चिम बंगामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाच उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील तीन जण तृणमूल काँग्रेसचा, एक रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) तर एक जण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. 

“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.   

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस