शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पश्चिम बंगालमधील खराब कामगिरीनंतर ममता बॅनर्जी दगाबाज नेत्यांच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 10:32 IST

सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० मतदार संघात भाजप चार हजार मतांनी पिछाडीवर असून ही तृणमूलसाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम बंगालमध्ये १९२ मतदार संघ अशांत आहे. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भागातील मतदार संघांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२९ विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. ममता यांनी यावर अंकुश लागावे म्हणून, पक्षांतील दगाबाज नेत्यांचा शोध सुरू केला आहे.

सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० मतदार संघात भाजप चार हजार मतांनी पिछाडीवर असून ही तृणमूलसाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम बंगालमध्ये १९२ मतदार संघ अशांत आहे. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भागातील मतदार संघांचा समावेश आहे.

ममता यांनी तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांना आदेश दिले की, अशा नेत्यांना शोधून काढा ज्यांनी सीपीएमची आणि तृणमूलची काही मते भाजपला वळविण्यास मदत केली. टीएमसीच्या अंतर्गत सर्व्हेत समोर आले की, त्यांना जंगलमहल आणि उत्तर बंगालमधील गरीब लोकांची मते मिळाली नाही. या भागात आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत.

टीएमसीच्या एका नेत्याने सांगितले की, टीएमसी शहरी आणि निम्म शहरी भागातील आपला मतदार कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे. परंतु, सातवे वेतन आयोग राज्यात लागू करण्यात आले नसल्याने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची ७० लाख मते टीएमसीला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेतील धक्क्यानंतर आता ममता बॅनर्जी पक्ष संघटनेवर अधिक भर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज्यातील विकास कामांचा मुद्दा निवडणुकीत दिसला नाही. आमचे सर्व मतदार अचानक देशभक्त झाल्याचा सूर तृणमूलच्या बैठकीत होता. तसेच अनेक नेते स्थानिक आमदारांच्या साथीने पक्षाच्या नावावर लोकांकडून पैसे घेतात, अशा नेत्यांचा शोध घेण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा