योगगुरू मुमताज अली यांच्या आशा यात्रेचे हिवरेबाजार येथे स्वागत
By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:30+5:302015-07-16T15:56:30+5:30
हिवरेबाजार : शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा करणारे केरळमधील त्रिवेंद्रम येथील योगगुरू श्री एम. ऊर्फ मुमताज अली यांचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे फुलांचा वर्षाव करत विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच आदर्शगाव संकल्पनेचे पोपटराव पवार यांनी भव्य स्वागत केले.

योगगुरू मुमताज अली यांच्या आशा यात्रेचे हिवरेबाजार येथे स्वागत
ह वरेबाजार : शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा करणारे केरळमधील त्रिवेंद्रम येथील योगगुरू श्री एम. ऊर्फ मुमताज अली यांचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे फुलांचा वर्षाव करत विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच आदर्शगाव संकल्पनेचे पोपटराव पवार यांनी भव्य स्वागत केले.मुमताज अली यांची पदयात्रा सुमारे ७५०० किमी व ११ राज्यामधून जाणार आहे. या यात्रेचे गुरुवारी सकाळी ११ वाजता हिवरेबाजार येथे आगमन झाले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे शालेय पथक तसेच ग्रामस्थांनी टाळांचा गजर करत या पदयात्रेची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली. योगगुरू अली यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी १२ जानेवारी २०१५ पासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा दररोज २० ते २५ कि.मी. अंतर चालते. ११ राज्ये, ८६ जिल्हे, ४५० गावामधून सुमारे ५०० दिवस या पदयात्रेचा प्रवास आहे. सर्व जाती धर्मातील लोकांशी संवाद साधून एकात्मतेचा संदेश देणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेतील भक्तांनी दिवसभर हिवरेबाजार गावाची पाहणी केली. गावकर्यांनी केलेले स्वागत, गावाचे व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण पाहून अली यांनी गावकर्यांचे कौतुक केले. सायंकाळी अली यांनी गावकर्यांशी संवाद साधून एकात्मतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)फोटो...कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ७५०० कि.मी. पदयात्रा करणारे योगगुरू मुमताज अली यांच्या पदयात्रेचे हिवरेबाजार येथे भव्य स्वागत करण्यात आले. (नागेश सोनवणे)(फोटो- १६ हिवरेबाजार)