शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रेल्वे प्रवासात सामान नेण्यावर वजनमर्यादा; जास्त वजनाच्या, मोठ्या आकाराच्या सामानावर दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:31 IST

सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर लागू होतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांच्या सामानाच्या वजन व आकारासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहे. हे नियम विमानतळाच्या धर्तीवर असतील. आतापर्यंत हे नियम कागदोपत्री होते, परंतु आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली जाणार आहे.

सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या लखनौ आणि प्रयागराज मंडलांतील प्रमुख स्थानकांवर लागू होतील. लखनौ चारबाग, बनारस, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल, मिर्झापूर, अलीगढ, गोविंदपुरी आणि इटावा या ठिकाणी प्रवासात सोबत असणाऱ्या सामानाचे वजन करणारी यंत्रणा बसवली जाणार आहे. सामानाचे वजन तपासल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वजनाच्या किंवा मोठ्या आकाराच्या सामानावर अतिरिक्त शुल्क किंवा दंड आकारला जाईल.

रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाला ठरावीक प्रमाणात मोफत सामान नेण्याची मुभा आहे. ही मर्यादा प्रवासाच्या वर्गानुसार बदलते. मर्यादा ओलांडल्यास दीडपट शुल्क आणि नियमभंग झाल्यास ६ पट दंड आकारण्याची तरतूद नियमात आहे. १०० किलोपेक्षा जड किंवा ठरावीक मापांपेक्षा मोठ्या सामानाला ‘बल्की’ मानले जाते आणि त्यावर दुप्पट शुल्क आकारले जाते.याशिवाय धोकादायक, स्फोटक, दुर्गंधीयुक्त वस्तू तसेच गॅस सिलिंडर, आम्ले आणि मृत प्राणी यांसारख्या वस्तू रेल्वेतून नेण्यास बंदी आहे. वैद्यकीय कारणासाठी रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत नेण्याची परवानगी आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वे