शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासात सामान नेण्यावर वजनमर्यादा; जास्त वजनाच्या, मोठ्या आकाराच्या सामानावर दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:31 IST

सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर लागू होतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांच्या सामानाच्या वजन व आकारासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहे. हे नियम विमानतळाच्या धर्तीवर असतील. आतापर्यंत हे नियम कागदोपत्री होते, परंतु आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली जाणार आहे.

सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या लखनौ आणि प्रयागराज मंडलांतील प्रमुख स्थानकांवर लागू होतील. लखनौ चारबाग, बनारस, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल, मिर्झापूर, अलीगढ, गोविंदपुरी आणि इटावा या ठिकाणी प्रवासात सोबत असणाऱ्या सामानाचे वजन करणारी यंत्रणा बसवली जाणार आहे. सामानाचे वजन तपासल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वजनाच्या किंवा मोठ्या आकाराच्या सामानावर अतिरिक्त शुल्क किंवा दंड आकारला जाईल.

रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाला ठरावीक प्रमाणात मोफत सामान नेण्याची मुभा आहे. ही मर्यादा प्रवासाच्या वर्गानुसार बदलते. मर्यादा ओलांडल्यास दीडपट शुल्क आणि नियमभंग झाल्यास ६ पट दंड आकारण्याची तरतूद नियमात आहे. १०० किलोपेक्षा जड किंवा ठरावीक मापांपेक्षा मोठ्या सामानाला ‘बल्की’ मानले जाते आणि त्यावर दुप्पट शुल्क आकारले जाते.याशिवाय धोकादायक, स्फोटक, दुर्गंधीयुक्त वस्तू तसेच गॅस सिलिंडर, आम्ले आणि मृत प्राणी यांसारख्या वस्तू रेल्वेतून नेण्यास बंदी आहे. वैद्यकीय कारणासाठी रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत नेण्याची परवानगी आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वे