शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

Weather update: पुढील 4 दिवस भीषण उष्णता! उन्हाने मोडला 12 वर्षांचा विक्रम, IMD ने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:37 IST

Weather update: भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील विदर्भासह अनेक राज्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Weather Update: पृथ्वीवरील हवामान बदलामुळे मागील काही वर्षात गरमी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यंदाही देशातील अनेक राज्यात भीषण उन्हाळा जाणवतोय. यातच आता पुढील 4 दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, शुक्रवारी राजधानी दिल्लीत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज असून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

IMD ने जारी केला ऑरेंज अलर्ट IMD ने आधीच शुक्रवारच्या अंदाजासह ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, शुक्रवारी दिल्लीतील किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त होते. IMD ने सकाळी 8.30 वाजता जारी केलेल्या बुलेटिननुसार, 'पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, जम्मू, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, आणि झारखंडच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशाच्‍या पश्‍चिमवरही याचा परिणाम दिसून येईल. 

अनेक भागात 'लू'हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजता हवेतील आर्द्रतेची पातळी 28 टक्के होती. IMD च्या मते, जेव्हा मैदानी भागात तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेव्हा उष्ण वारे 'लू' म्हणून घोषित केले जातात. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा 6.4 अंश जास्त असते तेव्हा 'तीव्र उष्णतेची लाट' घोषित केली जाते.

उन्हाळ्याने 12 वर्षांचा विक्रम मोडलादिल्लीत गुरुवारी 12 वर्षातील एप्रिलचा सर्वात उष्ण दिवस 43.5 अंश सेल्सिअस तापमानासह नोंदवला गेला. 18 एप्रिल 2010 रोजी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आर.के. जेनामनी यांनी सांगितले की, 25 फेब्रुवारीनंतर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतीय मैदानी भागात लक्षणीय पाऊस झालेला नाही. पण, पश्चिम विक्षोभामुळे 2 मे रोजी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :IndiaभारतSummer Specialसमर स्पेशल