शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:55 IST

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बोडो समुदायाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याचा शोध पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार घेईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणात केंद्रीय गृहमंत्री शहा बोलत होते. पहलगाम येथील हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता.

भारतातील ८२ टक्के कर्मचारी यावर्षी नोकरी बदलण्याच्या मानसिकतेत; वर्क-लाइफ बॅलेन्स

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बोडो समुदायाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दहशतवादाचे उच्चाटन

यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी आपल्या भाषणात, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प आहे आणि तो पूर्णत्वास जाईल यावर भर दिला. शहा म्हणाले की, ‘जर कोणी भ्याड हल्ला करून हा आपला मोठा विजय आहे असे समजत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, हे नरेंद्र मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. या देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प आहे.

दहशतवादाविरोधात आमची भूमिका स्पष्ट आहे. अशा गोष्टींचा पूर्णपणे बिमोड केला जाईल. प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. यातून कोणीही वाचणार नाही.

                - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

जग भारतासोबत आहे...

गृहमंत्री म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. हे केवळ त्यांच्या कुटुंबियांचे दुःख नाही तर संपूर्ण देशाचे दुःख आहे. मी सर्वांना खात्री देतो की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेईल. जर गुन्हेगारांना वाटत असेल की ते जिंकले आहेत, तर ती गंभीर चूक ठरेल. आम्ही प्रत्येक पराभवाचा बदला घेऊ. देशाच्या कोणत्याही भागात दहशतवाद टिकू दिला जाणार नाही आणि तो मुळापासून नष्ट केला जाईल. आज, जागतिक समुदाय दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत उभा आहे."

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा