शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मोदींनी बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम 'न्याय' करेल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:12 IST

काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने लोकांना देऊऩ आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

न्याय योजनेचं उद्देश देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणे आहे त्याचसोबत देशातील अर्थव्यवस्था बिघडली आहे तिला पूर्वपदावर आणण्यासाठी या योजनेचा वापर होईल असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षातील नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांनी देशातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. असंघटीत क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. मागील 5 वर्ष नरेंद्र मोदींनी गरिबांना काहीच दिलं नाही, गरिबांना लुटण्याचं काम या सरकारने केले म्हणून हा योजनेचे नाव न्याय असं ठेवण्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी शेतकरी, छोटे व्यापारी, बेरोजगार तरुण यांना देशोधडीला लावले, ज्या वंचित समाजाला लुटण्याचं काम मोदींनी केलं आम्ही त्या प्रत्येक घटकाला ते पुन्हा परत देणार आहोत. न्याय योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. सर्व अभ्यास करून ही योजना आणली आहे. न्याय योजना आणताना अर्थ विश्लेषक, या क्षेत्रातील तज्ज्ञ सगळ्यांचा अभ्यास करुनच घोषित केली आहे असंही राहुल यांनी सांगितले. न्याय योजना आणल्याने भाजपा घाबरली आहे. पंतप्रधानांनी आपलं काम व्यवस्थित केलं असतं तर गरिबी संपली असती मात्र तसं झालं नाही. न्याय योजनेने देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळ मिळेल असा दावाही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय योजनेवर सडकून टीका केली. ज्यांना गरिबांचे बॅंकेत खाते खोलता आले नाही ते लोक गरिबांना पैसे काय देणार? असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस