शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

मोदींनी बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम 'न्याय' करेल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:12 IST

काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने लोकांना देऊऩ आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

न्याय योजनेचं उद्देश देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणे आहे त्याचसोबत देशातील अर्थव्यवस्था बिघडली आहे तिला पूर्वपदावर आणण्यासाठी या योजनेचा वापर होईल असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षातील नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांनी देशातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. असंघटीत क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. मागील 5 वर्ष नरेंद्र मोदींनी गरिबांना काहीच दिलं नाही, गरिबांना लुटण्याचं काम या सरकारने केले म्हणून हा योजनेचे नाव न्याय असं ठेवण्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी शेतकरी, छोटे व्यापारी, बेरोजगार तरुण यांना देशोधडीला लावले, ज्या वंचित समाजाला लुटण्याचं काम मोदींनी केलं आम्ही त्या प्रत्येक घटकाला ते पुन्हा परत देणार आहोत. न्याय योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. सर्व अभ्यास करून ही योजना आणली आहे. न्याय योजना आणताना अर्थ विश्लेषक, या क्षेत्रातील तज्ज्ञ सगळ्यांचा अभ्यास करुनच घोषित केली आहे असंही राहुल यांनी सांगितले. न्याय योजना आणल्याने भाजपा घाबरली आहे. पंतप्रधानांनी आपलं काम व्यवस्थित केलं असतं तर गरिबी संपली असती मात्र तसं झालं नाही. न्याय योजनेने देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळ मिळेल असा दावाही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय योजनेवर सडकून टीका केली. ज्यांना गरिबांचे बॅंकेत खाते खोलता आले नाही ते लोक गरिबांना पैसे काय देणार? असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस