आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू!
By Admin | Updated: August 21, 2014 02:03 IST2014-08-21T02:03:14+5:302014-08-21T02:03:14+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला.

आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू!
नवी दिल्ली : भाजपाने दाखवलेल्या दिवास्वप्नांना जनता भुलली आणि म्हणूनच विकासाच्या अनेक योजना मार्गी लावूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला.
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 7क् व्या जयंतीप्रीत्यर्थ येथे आयोजित महिला काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या़ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेही यावेळी हजर होत़े संपुआ सरकारने आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात खूप काही केल़े मात्र याउपरही जनता काही लोकांनी दाखविलेल्या खोटय़ा स्वपAांना भुलली़ आमचे काम, आमच्या उपलब्धी एकीकडे राहिल्या आणि खोटी स्वप्ने दाखवणारे लोक पुढे निघून गेल़े खोटी आश्वासने आणि भ्रामक आशा दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात आली़ त्याचमुळे गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत संपुआचा पराभव झाला, असा दावा त्यांनी केला़ पण आम्ही पुन्हा परतू़ आपल्या संघर्षाचा मार्ग खडतर आणि कसोटी पाहणारा असू शकतो़ पण निष्ठा आणि अधिक परिश्रमाच्या साथीने एकत्र आलो तर हा मार्ग पार करणो कठीण नाही़ काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळेल तो दिवस दूर नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला़ भाषणात त्यांनी महिला सशक्तीकरणावर भर दिला़
काँग्रेसमध्ये महिलांची त्सुनामी येऊ द्या -राहुल गांधी
त्सुनामी आली होती, त्याचप्रमाणो काँग्रेसमध्ये महिलांची त्सुनामी येऊ द्या़ काँग्रेसला महिला शक्तीची साथ द्या, असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल़े महिला सशक्तीकरणाच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपाच्या विचारधारेतील अंतर सांगताना त्यांनी भाजपावर जोरदार तोफ डागली़ देवीची पूजा व्हावी पण महिलांना अधिकार मिळू नय़े तिने घराबाहेर पडता कामा नये, अशी नव्या सरकारची विचारधारा आह़े कॉंग्रेसची विचारधारा मात्र महिलांना बाहेर काढण्याची, त्यांना समान संधी देण्याची आह़े तेव्हा आता केवळ सत्तेची लढाई लढून भागणार नाही तर विचारधारेची लढाई लढावी लागेल, असे ते म्हणाल़े