शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

चीनएवढेच आम्हीही तुल्यबळ, घुसखोरी अजिबात खपवून घेणार नाही - लष्करप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:50 AM

भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे.

नवी दिल्ली : भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे.बिपिन रावत यांनी आज पत्रकारांना सांगितले की, उत्तर सीमेवर भारताने आता अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. चीनच्या आक्रमक धोरणाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतात आहे. भारताच्या उत्तर सीमाभागात चीनी लष्कराने घुसखोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबाबत ते म्हणाले की, आमच्या सीमा भागात कोणी घुसखोरी करत असेल, तर ते भारत अजिबात खपवून घेणार नाही. चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी बलवान नाही. चीनकडून सीमेवर सातत्याने कारवाया सुरू असून, भारताने कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची तयारी ठेवली आहे.शस्त्रसामुग्रीची ने-आण एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जलद गतीने करता यावी, तसेच उत्तर सीमेवरून पश्चिम सीमेवर लष्कर वेगाने हलविता यावे, यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करण्यावर भारताला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.रासायनिक, जैविक शस्त्रे आणि अण्वस्त्रांच्या वापराचा वाढता धोकारासायनिक, जैविक, रेडिआॅलॉजिकल अस्त्रे व अण्वस्त्रांच्या वापराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे, असे सांगून बिपिन रावत पुढे म्हणाले की, अशा शस्त्रे चुकीच्या माणसांच्या हातात पडणे व त्यांनी त्यांचा वापर करण्याचा धोका निर्माण होणे ही सर्वात गंभीर गोष्ट आहे. या शस्त्रांमुळे मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याचा धोका असून, त्याचे दूरगामी परिणामही भोगावे लागतील.काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बीमोड करूगेल्या वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बीमोड करण्यावर लष्कराने लक्ष केंद्रित केले होते. यंदाच्या वर्षी उत्तर काश्मीरमध्ये आम्ही दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी अधिक सक्रिय राहू, असे लष्करप्रमुख बिपिन रावत पुढे म्हणाले.आपल्याही जवानांना चांगल्या सुविधा हव्यातचीनच्या लष्कराचे उत्तर सीमेवर घुसखोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच सिक्कीम, तसेच ईशान्य सीमेवर तैनात भारतीय जवानांना बुलेट प्रूफ हेल्मेट देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा लागला, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बिपिन रावत म्हणाले की, चीनचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या आपल्याही जवानांना उत्तम दर्जाची जॅकेट्स व हेल्मेट मिळायला हवीत, असा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत