शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

India-China War: आम्हाला गावी जायचेय! चीन युध्दापासून तरसले गावकरी; मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:17 IST

India-China War 1962: चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जनजातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

भारत आणि चीनमध्येयुद्ध झालेल्या घटनेला आता सहा दशके लोटली आहेत. परंतू तेव्हा सीमेवरील गावांतून हलविण्यात आलेले गावकरी आज ना उद्या आपल्याला गावी जाता येईल या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. यासाठी त्यांनी केंद्र सरकार, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. 

चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. चीनने आक्रमण केल्याने भारत सरकारने आणि सैन्याने ही गावे रिकामी केली होती. या लोकांना आपल्या घरांसह जमिनी सोडण्याचे आदेश लष्कराने दिले होते. तिथे भारतीय सैन्याला तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून हे गावकरी आपले गाव सोडून आजपर्यंत बगोरी आणि वीरपूरच्या डुंडा भागात राहत आहेत. 

चीनसोबतचे युद्ध तर केव्हाच संपले होते. आज सहा दशके झाली तरी या गावकऱ्यांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी उत्तरकाशीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आम्हाला आमच्या गावी परत जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. तसेच आमच्या गावांना आदर्श गावाच्या रुपात विकसित करावे, असेही म्हटले आहे. तसेच दोन्ही गावांना भारत-चीन सीमेच्या अंतर्गत रेषेपासून आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्गापासून वेगळे करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतwarयुद्ध