शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

India-China War: आम्हाला गावी जायचेय! चीन युध्दापासून तरसले गावकरी; मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:17 IST

India-China War 1962: चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जनजातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

भारत आणि चीनमध्येयुद्ध झालेल्या घटनेला आता सहा दशके लोटली आहेत. परंतू तेव्हा सीमेवरील गावांतून हलविण्यात आलेले गावकरी आज ना उद्या आपल्याला गावी जाता येईल या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. यासाठी त्यांनी केंद्र सरकार, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. 

चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. चीनने आक्रमण केल्याने भारत सरकारने आणि सैन्याने ही गावे रिकामी केली होती. या लोकांना आपल्या घरांसह जमिनी सोडण्याचे आदेश लष्कराने दिले होते. तिथे भारतीय सैन्याला तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून हे गावकरी आपले गाव सोडून आजपर्यंत बगोरी आणि वीरपूरच्या डुंडा भागात राहत आहेत. 

चीनसोबतचे युद्ध तर केव्हाच संपले होते. आज सहा दशके झाली तरी या गावकऱ्यांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी उत्तरकाशीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आम्हाला आमच्या गावी परत जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. तसेच आमच्या गावांना आदर्श गावाच्या रुपात विकसित करावे, असेही म्हटले आहे. तसेच दोन्ही गावांना भारत-चीन सीमेच्या अंतर्गत रेषेपासून आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्गापासून वेगळे करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतwarयुद्ध