शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:40 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर भाष्य केले.

S Jaishankar : मागील अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानने अनेकदा भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे, पण भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येकवेळी पाकिस्तानची मैत्री धुडकावून लावली आहे. दरम्यान, आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर भारत-पाक संबंधांवर महत्वाचे भाष्य केले आहे.

शुक्रवारी (13 डिसेंबर 2024) लोकसभेत बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताला इतर शेजारी देशांप्रमाणे पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, परंतु आम्हाला दहशतवादमुक्त शेजारी पाहिजेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार नवीन जिंदाल यांनी लोकसभेत विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही माहिती दिली.

जयशंकर पुढे म्हणाले, भारताची दहशतवादाबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि ती पाकिस्तानलाही वारंवार सांगण्यात आली आहे. पाकिस्तानने त्यांचे वर्तन बदलले नाही, तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल. पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा अशी आमची इच्छा आहे. पाकिस्तानला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. त्यामुळे या प्रकरणाचा चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे आणि त्याचे काय करायचे, हे त्यांनी ठरवावे. 

भारताने वारंवार पाकिस्तानसोबत सीमापार असलेल्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाही, यावर आम्ही नेहमी भर दिलाय. यावेळी जयशंकर यांनी व्यापार संबंध बिघडल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरले आणि सांगितले की, 2019 मध्ये त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे द्वीपक्षीय व्यापारात ज्यामुळे व्यत्यय आला आहे.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तान