शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:40 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर भाष्य केले.

S Jaishankar : मागील अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानने अनेकदा भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे, पण भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येकवेळी पाकिस्तानची मैत्री धुडकावून लावली आहे. दरम्यान, आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर भारत-पाक संबंधांवर महत्वाचे भाष्य केले आहे.

शुक्रवारी (13 डिसेंबर 2024) लोकसभेत बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताला इतर शेजारी देशांप्रमाणे पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, परंतु आम्हाला दहशतवादमुक्त शेजारी पाहिजेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार नवीन जिंदाल यांनी लोकसभेत विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही माहिती दिली.

जयशंकर पुढे म्हणाले, भारताची दहशतवादाबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि ती पाकिस्तानलाही वारंवार सांगण्यात आली आहे. पाकिस्तानने त्यांचे वर्तन बदलले नाही, तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल. पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा अशी आमची इच्छा आहे. पाकिस्तानला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. त्यामुळे या प्रकरणाचा चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे आणि त्याचे काय करायचे, हे त्यांनी ठरवावे. 

भारताने वारंवार पाकिस्तानसोबत सीमापार असलेल्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाही, यावर आम्ही नेहमी भर दिलाय. यावेळी जयशंकर यांनी व्यापार संबंध बिघडल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरले आणि सांगितले की, 2019 मध्ये त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे द्वीपक्षीय व्यापारात ज्यामुळे व्यत्यय आला आहे.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तान