शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रोहिंग्यांच्या बाबतीत आपण सौम्य धोरण स्वीकारू नये- गृहराज्यमंत्री रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 13:15 IST

भारताने निर्वासितांबाबत सौम्य भूमिका स्वीकारता कामा नये. आपण त्यांना परत पाठविण्याची सोय केली पाहिजे असे वक्तव्य रिजिजू यांनी केले.

नवी दिल्ली- आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर तात्काळ टीका सुरु झाली आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. संसदेत याबाबत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारताने रोहिंग्यांच्या बाबतीत सौम्य धोऱण स्वीकारू नये अशी भूमिका संसदेत मांडली.

भारताने निर्वासितांबाबत सौम्य भूमिका स्वीकारता कामा नये. आपण त्यांना परत पाठविण्याची सोय केली पाहिजे असे वक्तव्य रिजिजू यांनी केले. यावर संसदेत एकच गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनीही राज्यसभेत बोलताना राजीव गांधी यांनी 1985 साली आसाम करार केला, त्यानुसार घुसखोर निर्वासितांना शोधण्यासाठी एनआरसीची स्थापना झाली असे मत मांडले. यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेत राज्यसभेत घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले.देशातील रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये आहे. त्यानंतर ते हैदराबार व तेलंगणामध्ये राहात आहेत. रोहिंग्यांचा देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे असे रिजिजू यांनी मत मांडले.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संसदेत म्हणाले, राज्य सरकारांनी रोहिंग्यांची मोजणी करावी. रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नाबाबत केंद्राकडून राज्य सरकारांना मार्गदर्शनासाठी नियमावली पाठवण्यात आली आहे. राज्यातील रोहिंग्यांच्या संख्येबाबत राज्य सरकारांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती द्यावी. त्याआधारावर संबंधित माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली जाईल. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय याबाबत म्यानमारशी त्यांना परत पाठवण्याबाबत चर्चा करेल." 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याAssamआसाम