शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

रोहिंग्यांच्या बाबतीत आपण सौम्य धोरण स्वीकारू नये- गृहराज्यमंत्री रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 13:15 IST

भारताने निर्वासितांबाबत सौम्य भूमिका स्वीकारता कामा नये. आपण त्यांना परत पाठविण्याची सोय केली पाहिजे असे वक्तव्य रिजिजू यांनी केले.

नवी दिल्ली- आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर तात्काळ टीका सुरु झाली आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. संसदेत याबाबत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारताने रोहिंग्यांच्या बाबतीत सौम्य धोऱण स्वीकारू नये अशी भूमिका संसदेत मांडली.

भारताने निर्वासितांबाबत सौम्य भूमिका स्वीकारता कामा नये. आपण त्यांना परत पाठविण्याची सोय केली पाहिजे असे वक्तव्य रिजिजू यांनी केले. यावर संसदेत एकच गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनीही राज्यसभेत बोलताना राजीव गांधी यांनी 1985 साली आसाम करार केला, त्यानुसार घुसखोर निर्वासितांना शोधण्यासाठी एनआरसीची स्थापना झाली असे मत मांडले. यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेत राज्यसभेत घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले.देशातील रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये आहे. त्यानंतर ते हैदराबार व तेलंगणामध्ये राहात आहेत. रोहिंग्यांचा देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे असे रिजिजू यांनी मत मांडले.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संसदेत म्हणाले, राज्य सरकारांनी रोहिंग्यांची मोजणी करावी. रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नाबाबत केंद्राकडून राज्य सरकारांना मार्गदर्शनासाठी नियमावली पाठवण्यात आली आहे. राज्यातील रोहिंग्यांच्या संख्येबाबत राज्य सरकारांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती द्यावी. त्याआधारावर संबंधित माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली जाईल. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय याबाबत म्यानमारशी त्यांना परत पाठवण्याबाबत चर्चा करेल." 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याAssamआसाम