शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही पाकिस्तानची ६ विमाने पाडली; 'ऑपरेशन सिंदूर’ हे उच्च तांत्रिक युद्धच, हवाई दल प्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:17 IST

पाकचे इतके मोठे नुकसान झाले की, त्यांनी थेट चर्चेचा निरोप दिला

बंगळुरू : 'ऑपरेशन सिंदूर'मध्येभारतीय हवाई दलानेपाकिस्तानचे मोठे नुकसान केले व यात भारताने पाकिस्तानचे एडब्ल्यूएसीएस श्रेणीतील एक विमान आणि पाच लढाऊ विमाने पाडली, अशी माहिती हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह यांनी दिली. ते बंगळुरू येथील एचएएल मॅनेजमेंट अकादमी सभागृहात एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरच्या १६ व्या सत्रात बोलत होते.

सिंह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर’दरम्यानभारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सरगोधा व जेकोबाबाद हवाई तळावरील एफ-१६ विमानांना लक्ष्य केले. भारतीय हवाई दलाकडे या एफ-१६ विमानांबाबत ठोस माहिती होती.

ऑपरेशन सिंदूर उच्च तांत्रिक कौशल्याच्या आधारे केलेले युद्ध होते, असे सांगत सिंह म्हणाले की, ८० ते ९० तासांच्या युद्धात, आम्ही पाकिस्तानचे इतके मोठे नुकसान केले की त्यानंतर त्यांनी आमच्या डीजीएमओला चर्चेसाठी संदेश पाठवला.

बहावलपूर हल्ल्यानंतरचे फोटो सर्वांसमोर

२०१९ मध्ये आम्ही बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले तेव्हा आम्हाला त्याचे पुरावे गोळा करता आले नाहीत. आम्ही काय केले किंवा काय केले नाही, याबद्दल लोकांनी प्रश्न उपस्थित केले. 

पण, ऑपरेशन सिंदूरवेळी बहावलपूर हल्ल्याआधीचे व नंतरचे फोटो सर्वांसमोर आहेत. दहशतवादी अड्डे पूर्ण उद्ध्वस्त झाले. तिथे काहीही शिल्लक राहिले नव्हते. हे फोटो केवळ उपग्रहावरून घेतले गेले नाहीत. तर स्थानिक माध्यमांनी उद्ध्वस्त इमारतीचे आतील फोटोदेखील दाखवले, असेही त्यांनी सांगितले.

एस-४०० प्रणाली ठरली गेम चेंजर

आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्तम काम केले. पाककडे लांब पल्ल्याचे ग्लाइड बॉम्ब होते, परंतु ते वापरू शकले नाहीत. कारण ते भारताची हवाई संरक्षण यंत्रणा भेदू शकत नव्हते. यात भारताची एस-४०० प्रणाली गेम चेंजर ठरली, असे सिंह यांनी सांगितले.

आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते...

या यशाचे एक प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्ती होती. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. यामुळे आम्ही योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू शकलो. तिन्ही दलांमध्ये समन्वय होता, असे सिंह यांनी नमूद केले.

कसे झाले ऑपरेशन सिंदूर?

७ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले. यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. 

पाकच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबाद येथे हे हल्ले केले. यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय व जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा तळ उद्ध्वस्त झाला.

का थांबवले? : काँग्रेस

भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडल्याचे हवाई दल प्रमुखांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूर का थांबवले आणि कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान