शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

आम्ही पाकिस्तानची ६ विमाने पाडली; 'ऑपरेशन सिंदूर’ हे उच्च तांत्रिक युद्धच, हवाई दल प्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:17 IST

पाकचे इतके मोठे नुकसान झाले की, त्यांनी थेट चर्चेचा निरोप दिला

बंगळुरू : 'ऑपरेशन सिंदूर'मध्येभारतीय हवाई दलानेपाकिस्तानचे मोठे नुकसान केले व यात भारताने पाकिस्तानचे एडब्ल्यूएसीएस श्रेणीतील एक विमान आणि पाच लढाऊ विमाने पाडली, अशी माहिती हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह यांनी दिली. ते बंगळुरू येथील एचएएल मॅनेजमेंट अकादमी सभागृहात एअर चीफ मार्शल एलएम कात्रे मेमोरियल लेक्चरच्या १६ व्या सत्रात बोलत होते.

सिंह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर’दरम्यानभारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सरगोधा व जेकोबाबाद हवाई तळावरील एफ-१६ विमानांना लक्ष्य केले. भारतीय हवाई दलाकडे या एफ-१६ विमानांबाबत ठोस माहिती होती.

ऑपरेशन सिंदूर उच्च तांत्रिक कौशल्याच्या आधारे केलेले युद्ध होते, असे सांगत सिंह म्हणाले की, ८० ते ९० तासांच्या युद्धात, आम्ही पाकिस्तानचे इतके मोठे नुकसान केले की त्यानंतर त्यांनी आमच्या डीजीएमओला चर्चेसाठी संदेश पाठवला.

बहावलपूर हल्ल्यानंतरचे फोटो सर्वांसमोर

२०१९ मध्ये आम्ही बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले तेव्हा आम्हाला त्याचे पुरावे गोळा करता आले नाहीत. आम्ही काय केले किंवा काय केले नाही, याबद्दल लोकांनी प्रश्न उपस्थित केले. 

पण, ऑपरेशन सिंदूरवेळी बहावलपूर हल्ल्याआधीचे व नंतरचे फोटो सर्वांसमोर आहेत. दहशतवादी अड्डे पूर्ण उद्ध्वस्त झाले. तिथे काहीही शिल्लक राहिले नव्हते. हे फोटो केवळ उपग्रहावरून घेतले गेले नाहीत. तर स्थानिक माध्यमांनी उद्ध्वस्त इमारतीचे आतील फोटोदेखील दाखवले, असेही त्यांनी सांगितले.

एस-४०० प्रणाली ठरली गेम चेंजर

आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्तम काम केले. पाककडे लांब पल्ल्याचे ग्लाइड बॉम्ब होते, परंतु ते वापरू शकले नाहीत. कारण ते भारताची हवाई संरक्षण यंत्रणा भेदू शकत नव्हते. यात भारताची एस-४०० प्रणाली गेम चेंजर ठरली, असे सिंह यांनी सांगितले.

आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते...

या यशाचे एक प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्ती होती. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. यामुळे आम्ही योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू शकलो. तिन्ही दलांमध्ये समन्वय होता, असे सिंह यांनी नमूद केले.

कसे झाले ऑपरेशन सिंदूर?

७ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले. यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. 

पाकच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबाद येथे हे हल्ले केले. यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय व जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा तळ उद्ध्वस्त झाला.

का थांबवले? : काँग्रेस

भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडल्याचे हवाई दल प्रमुखांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूर का थांबवले आणि कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान