शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

आजच्या काळात समान नागरी कायद्याची गरज; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 5:18 PM

अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 44 च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेल स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

लखनऊः देशात पुन्हा एकदा समान नागरी संहिता(Uniform Civil Code)वर चर्चा सुरू झाली आहे. आज आंतरधर्मीय जोडप्यांनी मागितलेल्या संरक्षणाशी संबंधित 17 याचिकांवर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने समान नागरी संहिता देशासाठी आवश्यक असून केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयानेकेंद्र सरकारला कलम 44 च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेल स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. कलम 44 नुसार, भारतातील नागरिकांसाठी एकसमान नागरी संहिता किंवा समान नागरी संहिता(UCC) सुरक्षित करण्याचा सरकार प्रयत्न करेल. याचिकाकर्त्यांच्या विवाहांची तात्काळ नोंदणी करावी आणि धर्म परिवर्तनाबाबत सक्षम जिल्हा प्राधिकरणाच्या मान्यतेची वाट पाहू नये आणि झालेच तर नोंदणीसाठी आग्रह धरू नये, असेही न्यायालयाने या प्रकरणी विवाह निबंधकांना बजावले आहे.

आंतरधर्मीय जोडप्यांना गुन्हेगार समजू नये

न्यायालयाने पुढे म्हटले की, आजच्या काळात यूसीसी खूप महत्त्वाचे आहे आणि त्याची नितांत गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 75 वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्पसंख्याक समाजातील सदस्यांनी व्यक्त केलेली आशंका आणि भीती लक्षात घेऊन तो ऐच्छिक करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सुनीत कुमार म्हणाले की संसदेने 'सिंगल फॅमिली कोड' विचारात घेणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण मिळू शकेल आणि त्यांना गुन्हेगार म्हणून वागवले जाणार नाही.

विवाहासाठी प्राधिकरणाच्या मान्यतेची गरज नाहीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी सांगितले की, जिल्हा प्राधिकरणाच्या चौकशीशिवाय याचिकाकर्त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येणार नाही. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, या लोकांनी लग्नापूर्वी धर्मांतर करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची आवश्यक मान्यता घेतलेली नाही. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितले की, आपला जोडीदार आणि धर्म निवडणे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि धर्मांतर त्यांच्या इच्छेने झाले आहे. सरकार आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे निवड, जीवन आणि स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल. विवाहापूर्वी धर्म परिवर्तन आणि जिल्हा प्राधिकरणाची मान्यता ही विवाह नोंदणीसाठी अनिवार्य अट नाही. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ