शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:10 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावर आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे विधान चर्चेत आले आहे.

गेल्या दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्या, काल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली. यात त्यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोघांनीही युद्धबंदीची घोषणा केल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावरही विधान केले.

आता यावर शिवसेना (ठाकरे गटाच्ये) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे एक विधान समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिल्यानंतर भारताला अमेरिका किंवा कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट काय केली?

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकला. जरी त्यावर चर्चा झालेली नसली तरी, मी या दोन्ही महान देशांसोबत व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.

ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, 'काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी दो्ही देशांसोबत काम करेन.' जर दोघांमध्ये शांतता प्रस्थापित झाली नसती तर लाखो लोक मृत्युमुखी पडले असते, असं यामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मिडिया प्लॅफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्याबाबत एक विधान केले. "कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाशिवाय भारताने आव्हानाचा सामना करावा यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी भर दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नियतीने आपल्याला ही जबाबदारी दिली आहे आणि भारताने या आव्हानाचा सामना केला पाहिजे.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, 'काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही.'

दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली

जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला वारंवार नकार दिला आहे. हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. शनिवारी, भारतानेही शत्रुत्व संपवण्याच्या करारात अमेरिकेच्या भूमिकेला कमी लेखले आणि म्हटले की दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये करार झाला आहे.

"भारताने दहशतवादाविरुद्धची आपली भूमिका सातत्याने कायम ठेवली आहे.'भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि अटल भूमिका कायम ठेवली आहे, असंही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPakistanपाकिस्तानIndiaभारत