शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:10 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावर आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे विधान चर्चेत आले आहे.

गेल्या दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्या, काल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली. यात त्यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोघांनीही युद्धबंदीची घोषणा केल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावरही विधान केले.

आता यावर शिवसेना (ठाकरे गटाच्ये) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे एक विधान समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिल्यानंतर भारताला अमेरिका किंवा कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट काय केली?

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकला. जरी त्यावर चर्चा झालेली नसली तरी, मी या दोन्ही महान देशांसोबत व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.

ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, 'काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी दो्ही देशांसोबत काम करेन.' जर दोघांमध्ये शांतता प्रस्थापित झाली नसती तर लाखो लोक मृत्युमुखी पडले असते, असं यामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मिडिया प्लॅफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्याबाबत एक विधान केले. "कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाशिवाय भारताने आव्हानाचा सामना करावा यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी भर दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नियतीने आपल्याला ही जबाबदारी दिली आहे आणि भारताने या आव्हानाचा सामना केला पाहिजे.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, 'काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही.'

दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली

जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला वारंवार नकार दिला आहे. हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. शनिवारी, भारतानेही शत्रुत्व संपवण्याच्या करारात अमेरिकेच्या भूमिकेला कमी लेखले आणि म्हटले की दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये करार झाला आहे.

"भारताने दहशतवादाविरुद्धची आपली भूमिका सातत्याने कायम ठेवली आहे.'भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि अटल भूमिका कायम ठेवली आहे, असंही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPakistanपाकिस्तानIndiaभारत