शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आम्ही भाजपाला सोडले; पण हिंदुत्वावर ठामच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 01:35 IST

उद्धव ठाकरे । अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन

अयोध्या : भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, त्यामुळे शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली, याचा अर्थ आम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली असा होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी व पुत्र, तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह येथे श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेतर्फे १ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली.

त्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रात शिवसेनेने महाआघाडी सरकार स्थापन केले असले, तरी आतापर्यंतची हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, तसेच राज्य सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून, आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा दावा केला.

उद्धव ठाकरे यांना अयोध्येत उत्तर प्रदेश पोलिसांनी मानवंदना दिली. त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक उपस्थित होते. त्यात मुंबई-ठाण्यातून गेलेल्या शिवसैनिकांचाही समावेश होता. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जवळपास सर्व खासदार व राज्यातील मंत्रीही होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, कारण आमच्यात मतभेद नाहीत, असा दावाही त्यांनी केला.अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी होती. त्यासाठी केंद्राने कायदा करावा, असेही आम्ही म्हटले होते, पण केंद्राने कायदा केला नाही आणि नोव्हेंबरात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असे सांगून ठाकरे म्हणाले. तीन संत नजरकैदेतउद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचे काही संत-महन्तांनी जाहीर केले होते. त्यामुळे ते येण्याआधी महन्त परमहंस दास, महन्त राजू दास व हिंदू महासभेचे अध्यक्ष राकेश मिश्रा यांनी पोलिसांनी त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले होते.ट्रस्टवर हवे प्रतिनिधित्वउद्धव ठाकरे अयोध्येत असतानाच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी राम मंदिरासाठीच्या ट्रस्टवर शिवसेनेचा प्रतिनिधी नेमण्यात यावा, अशी मागणी केली.नदीची आरती टाळलीउद्धव ठाकरे यांची संध्याकाळी अयोध्येतील शरयू नदीची आरती करण्याचीही इच्छा होती. त्यांच्या मूळ कार्यक्रमातही त्याचा समावेश होता, पण कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला सर्व नेत्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनीही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. श्रीरामाच्या दर्शनानंतर ते लगेचच लखनौला आले आणि तेथून मुंबईकडे निघाले.भवनासाठी जमीन द्याउद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून इथे येणाºया रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ वा उत्तर प्रदेश सरकार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, अयोध्या वा जवळच्या फैजाबादमध्ये त्यासाठी जमीन मिळू शकेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा