शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Coronavirus: महाभारताचं युद्ध १८ दिवस चाललं, कोरोनाविरुद्धचं युद्ध २१ दिवस चालेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 6:30 PM

Coronavirus कृपया घराबाहेर पडू नका; मोदींकडून पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतील लोकांशी संवाद साधला. महाभारताचं युद्ध १८ दिवस सुरू होतं. कोरोनाविरुद्धचं युद्ध २१ दिवस सुरू राहील आणि त्यात विजयी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील जनतेशी संवाद साधत संपूर्ण देशाला दिशा दाखवण्याचं आवाहन केलं. महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं. आता कोरोनाविरोधात संपूर्ण देश लढतोय. २१ दिवसांत हे युद्ध जिंकण्याचा आपला प्रयत्न आहे. महाभारतातल्या युद्धात भगवान श्रीकृष्ण सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपण कोरोनाविरोधात लढत आहोत. यामध्ये काशीच्या रहिवाशांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन असल्यानं काशी देशाला संयम, समन्वय आणि संवेदनशीलता शिकवू शकते. सहयोग, शांती, सहनशीलतेची शिकवण काशी देशाला देऊ शकते. साधना, सेवा, समाधानाचा धडा काशीवासी देशाला देऊ शकतात, असं मोदी म्हणाले. वाराणसीच्या लोकांशी संवाद साधताना मोदींनी काशीचं महत्त्व सांगितलं. काशीचा अर्थच शिव असा होतो. शिव म्हणजे कल्याण. शंकराच्या नगरीत, महादेवाच्या या नगरीमध्ये संकटाशी दोन हात करण्याचा मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य आहे, अशा शब्दांत मोदींनी काशीचं महात्म्य अधोरेखित केलं. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता लोकांनी घरातच थांबावं, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. सरकारनं कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लोकांनी घरातून बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्याचा हा सर्वात चांगला उपाय असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी