शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

गौरी लंकेश यांच्या हत्येशी आमचा काही संबंध नाही - सनातन संस्थेने केला हत्येचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:07 IST

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे

ठळक मुद्देसनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहेडॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवल्याचा दावा

बेंगळुर - पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. हिंदू कार्यकर्ते आणि डाव्या विचारसरणीचे लोक यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, परंतु म्हणून डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खून हिंदू कार्यकर्त्यांनी केला असं मानणं चुकीचं आहे असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बेंगळुर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

आम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी केला आहे आणि लोकशाही मार्गाने जात कायदेशीर उपाय केले आहेत असा दावा राजहंस यांनी केला. गोवास्थित सनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी विशेष चौकशी समितीला सहकार्य करण्याची संस्थेची तयारी असल्याचेही राजहंस म्हणाले. गोव्यातील पोंडा या मुख्यालयात यावे आणि अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे त्यांनी सांगितले. या हत्येशी संदर्भात अद्याप पोलीसांनी संस्थेची चौकशी केली नसल्याचेही ते म्हणाले.

काही राजकीय नेते, ढोंगी मुक्त विचारसरणीचे लोक आणि पत्रकार हिंदुत्ववादी संघटनांवर लंकेश यांची हत्या केल्याचा बेछुट आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव व वकिल संजीव पुनाळेकर यांनी असा आरोप केला आहे की, हिंदू जनजागृती समितीचे नेते डॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवण्यात आले आहे.गौरी लंकेश प्रकरणी तपास पथकानं नक्षली, कौटुंबिक कलह, मालमत्ता वाद, स्थानिक वाद आणि लंकेश यांना मिळत असलेला निधी या अंगानं चौकशी करायला हवी असं मत पुनाळकर यांनी व्यक्त केलं आहे. विशिष्ट बनावटीच्या पिस्तुलानं लंकेश यांची हत्या झाली यावरून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली असा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. याप्रकरणी संस्था व समिती या दोघांना गोवणं गैर असल्याचं ते म्हणाले.

दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या ज्या शस्त्रांनी झाली त्याबाबत उलटसुलट अहवाल असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. पोलीसांनीच यासंदर्भात उलट सुलट मतं व्यक्त केल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं आहे. विशेष तपास पथकाला सनातन संस्थेची चौकशी करायची असेल तर त्यास आम्ही तयार आहोत असं पुनाळेकर म्हणाले. तपास पथकं स्थानिक पोलीसांच्या मदतीनं काही साधकांना फोन करून माहिती घेत असल्याचे पुनाळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशCrimeगुन्हा