शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:49 IST

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची भारत दौऱ्यावर आले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची भारत दौऱ्यावर आले आहेत. आपल्या समकक्षांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "तुम्ही अशा वेळी भारतात आला आहात, जेव्हा आम्ही २२ एप्रिल रोजी भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बर्बर हल्ल्याचे प्रत्युत्तर देत आहोत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला ७ मे रोजी सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर हल्ला करावा लागला."

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले की, "आमचे हे प्रत्युत्तर विचारपूर्व देण्यात आले होते. परिस्थिती आणखी चिघळवण्याचा आमचा कोणताही हेतु नव्हता. तथापि, जर आमच्यावर लष्करी हल्ला झाला, तर त्याला खूप कडक प्रत्युत्तर दिले जाईल यात शंका नाही. शेजारी देश आणि जवळचा साथीदार म्हणून, तुम्हाला या परिस्थितीची चांगली समज असणे महत्त्वाचे आहे."

राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापन दिन!

तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "आज भारतात तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना आणि तुमच्यासोबत २० व्या भारत-इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवताना मला खूप आनंद होत आहे. अलिकडच्या काळात, आपल्या सहकार्याने मोठी प्रगती झाली आहे. मात्र, अशा काही परिस्थिती आहेत, ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पेझेश्कियान यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये काझान येथे भेट घेतली आणि आपले संबंध कसे दृढ होतील, याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी २६ एप्रिल रोजी फोनवरही चर्चा केली. हा आपल्या राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापन दिन आहे. मला खात्री आहे की, आपण हा वर्धापन दिन योग्यरित्या साजरा करू."

भारत आणि इराणमधील २०व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषविण्यासाठी अरागची भारतात आले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर इराणी परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान