शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

"आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला", वित्त आयोग अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:30 IST

Arvind Panagariya on PM Modi: १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर बोटं ठेवलं. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारकडून पंतप्रधान मोदी यांना नाजूक अवस्थेत असलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला होता. पण, भारताने विकास करण्यासाठी खूप काम केले. यापेक्षाही अधिक काम करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने नियंत्रणात आणली गेली आहेत, असे भाष्य १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत बोलताना अरविंद पानगरिया म्हणाले, "आपण विसरून जातो की, वास्तविकता पंतप्रधान मोदी यांना एका नाजूक अवस्थेत असलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला होता. यूपीए सरकारची शेवटची दोन-तीन वर्षात गोष्टी बिघडल्या होत्या. हे सगळं सगळ्यात वाईट कायदे बनवल्यामुळे घडलं होतं."

"आम्ही शिक्षणाचा अधिकार कायदा आणला, जो गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात अडथळा ठरू लागला आणि आम्ही भूसंपादन कायदा आणला, ज्यामुळे नंतर आलेल्या पंतप्रधानांना काम करणे कठीण बनले. कारण जमिनीची किंमत खूप जास्त करून ठेवली गेली होती", असे अरविंद पानगरिया यांनी सांगितले. 

"रस्त्यासारख्या प्रोजेक्टमध्ये जमीन खरेदी एकूण प्रोजेक्टच्या किंमतीपैकी तीन चतुर्थांश पैसे खर्च होतात. याचा अर्त हाच की, ज्या पैशांमध्ये २ किमी रस्ता बनू शकला असता, त्यात तुम्ही फक्त १ किमी रस्ता तयार करता येत आहे", असे अरविंद पानगरिया म्हणाले.

विकासाला गती देण्याच्या मुद्द्यावर बोलताना पानगरिया यांनी सांगितले की, "रेल्वे आणि नागरी उड्डाण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल व्यवहाराशी संबंधित इतर पायाभूत सुविधांवरही लक्ष्य दिलं गेलं पाहिजे. विकसित भारत हे स्वप्न सत्यात येऊ शकतं. मागील २० वर्षात म्हणजे २००३-०४ ते २०२२-२३  पर्यंत विचार केला तर भारताचा जीडीपी वाढीचा दर १०.२ टक्के आहे. लोकांना जाणीव नाहीये की, डॉलरच्या तुलनेत आपण जास्त वेगाने विकास गेला आहे."

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीManmohan Singhडॉ. मनमोहन सिंग