शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

"आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला", वित्त आयोग अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:30 IST

Arvind Panagariya on PM Modi: १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर बोटं ठेवलं. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारकडून पंतप्रधान मोदी यांना नाजूक अवस्थेत असलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला होता. पण, भारताने विकास करण्यासाठी खूप काम केले. यापेक्षाही अधिक काम करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने नियंत्रणात आणली गेली आहेत, असे भाष्य १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत बोलताना अरविंद पानगरिया म्हणाले, "आपण विसरून जातो की, वास्तविकता पंतप्रधान मोदी यांना एका नाजूक अवस्थेत असलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला होता. यूपीए सरकारची शेवटची दोन-तीन वर्षात गोष्टी बिघडल्या होत्या. हे सगळं सगळ्यात वाईट कायदे बनवल्यामुळे घडलं होतं."

"आम्ही शिक्षणाचा अधिकार कायदा आणला, जो गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात अडथळा ठरू लागला आणि आम्ही भूसंपादन कायदा आणला, ज्यामुळे नंतर आलेल्या पंतप्रधानांना काम करणे कठीण बनले. कारण जमिनीची किंमत खूप जास्त करून ठेवली गेली होती", असे अरविंद पानगरिया यांनी सांगितले. 

"रस्त्यासारख्या प्रोजेक्टमध्ये जमीन खरेदी एकूण प्रोजेक्टच्या किंमतीपैकी तीन चतुर्थांश पैसे खर्च होतात. याचा अर्त हाच की, ज्या पैशांमध्ये २ किमी रस्ता बनू शकला असता, त्यात तुम्ही फक्त १ किमी रस्ता तयार करता येत आहे", असे अरविंद पानगरिया म्हणाले.

विकासाला गती देण्याच्या मुद्द्यावर बोलताना पानगरिया यांनी सांगितले की, "रेल्वे आणि नागरी उड्डाण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल व्यवहाराशी संबंधित इतर पायाभूत सुविधांवरही लक्ष्य दिलं गेलं पाहिजे. विकसित भारत हे स्वप्न सत्यात येऊ शकतं. मागील २० वर्षात म्हणजे २००३-०४ ते २०२२-२३  पर्यंत विचार केला तर भारताचा जीडीपी वाढीचा दर १०.२ टक्के आहे. लोकांना जाणीव नाहीये की, डॉलरच्या तुलनेत आपण जास्त वेगाने विकास गेला आहे."

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीManmohan Singhडॉ. मनमोहन सिंग