शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोलाचा सल्ला; आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन नको, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 17:48 IST

भारत, पाकिस्तान, चीनच्या सीमा प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाष्य केलं.

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे सीमेवरही तणाव सुरु असल्याचं चित्र आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये अनेकदा खटके उडत असतात, चीनने याठिकाणी युद्ध सराव करत भारताविरोधात आक्रमक रणनीती वापरली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवरही दररोज गोळीबार, चकमकी सुरु असतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

गुजरात जनसंवाद संमेलनात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पाकिस्तान आपल्या देशाच्या एका बाजूला आहे, तर चीन दुसऱ्या बाजूला आहे. आम्हाला शांतता आणि अहिंसा हवी आहे. आम्ही कधीही भूतान किंवा बांगलादेशाची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन नको, आम्हाला फक्त शांतता हवी असं त्यांनी सांगितले.

 

कोरोनावर लवकरच लस मिळेल

याच कार्यक्रमात गडकरींना कोरोना संकटावरही भाष्य केले. देशात कोरोना संकट आणखी जास्त काळ टिकणार नाही. आपले वैज्ञानिक आणि इतर शास्त्रज्ञ दिवसरात्र कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच कोरोनावर लस शोधली जाईल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.

 

भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ९२९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा आकडा ३ लाख २० हजारांवर पोहचला आहे. संक्रमणामुळे एका दिवसात ३११ लोकांचा मृत्यू होऊन आतापर्यंत मृतांचा आकडा ९ हजारांवर गेला आहे. देशात १ लाख ४९ हजार ३४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तर १ लाख ६२ हजार ३७८ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

देशात एकीकडे कोरोना संकट असताना दुसरीकडे सीमेपलीकडूनही भारताविरोधात षडयंत्र सुरुच आहेत. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानने कुरापती सुरुच ठेवल्या आहेत तर कोरोनासाठी जबाबदार धरण्यात येत असलेल्या चीनने लडाख सीमेवरुन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर नेपाळसारख्या देशानेही भारताचे तीन भूभाग त्यांच्या नकाशात दाखवून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाळच्या नवीन नकाशाला नेपाळच्या संसदेत मंजूरीही देण्यात आली आहे. चीनसोबत तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्य स्तरावर अनेक बैठका सुरु आहेत तरीही चीन-भारत सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यात अपयश आलं आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनNitin Gadkariनितीन गडकरीPakistanपाकिस्तानcorona virusकोरोना वायरस बातम्या