शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली"; मुख्यमंत्री योगींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:33 IST

प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

MahaKumbh 2025: १४४ वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची सांगता २६ फेब्रुवारी रोजी झाली. देशासह जगभरातील भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभात स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने कोट्यवधि भाविकांसाठी मोठी व्यवस्था केली होती. मात्र मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत  ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे योगी सरकारच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली योगी आदित्यनाथ यांनी दिली.

महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले ८ कोटी भाविकही घाबरले असते, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.  महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

आयआयएम अधिकारी आणि भारतीय टपाल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला योगी आदित्यनाथ बोलत होते. "आम्ही या घटनेची जास्त प्रसिद्धी होऊ दिली नाही, कारण त्यावेळी प्रयागराज आणि कुंभमेळा परिसरात आठ कोटी भाविक आणि संत उपस्थित होते आणि अराजकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकली असती. चेंगराचेंगरीची घटना २९ जानेवारीच्या रात्री १:१५ ते १:३० च्या दरम्यान घडली. त्यावेळी कुंभमेळा परिसरात सुमारे ४ कोटी लोकांची गर्दी होती. चेंगराचेंगरी होताच, जखमींना १५ मिनिटांत रुग्णालयात नेण्यात आले, असं योगींनी म्हटलं.

"लाखो भाविकांसोबतच १३ आखाड्यातील संतही त्या दिवशी सकाळी अमृतस्नानासाठी सहभागी होणार होते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनावेळी दोन प्रमुख समस्या अनेकदा उद्भवतात. एक म्हणजे संतांच्या आंघोळीचा क्रम ठरवणे आणि दुसरे म्हणजे पहाटे ४ वाजता विधी सुरळीतपणे पार पडेल याची खात्री करणे. चेंगराचेंगरीची ही घटना घडल्यामुळे सर्व आखाडे स्नानासाठी तयार असतानाही प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्या स्नानाचा कार्यक्रम पुढे ढकलला. परिस्थिती हाताळण्यासाठी मी त्यांना स्वतःहून विधी पुढे ढकलण्याची विनंती केली होती,"

"चेंगराचेंगरीनंतर अधिकाऱ्यांनी गर्दीवर बारीक लक्ष ठेवले. त्यानंतर संगम परिसर दुपारपर्यंत रिकामा केला आणि दुपारी २.३० पासून आंघोळ पुन्हा सुरू होईल याची तयारी केली. अशावेळी कठीण परिस्थितीत अनेक लोक घाबरतात आणि हार मानतात, पण संयम आणि नियंत्रणाने ठोस निर्णय घेण्याची शक्ती आपण विकसित केली पाहिजे," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश