शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

"परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली"; मुख्यमंत्री योगींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:33 IST

प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

MahaKumbh 2025: १४४ वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची सांगता २६ फेब्रुवारी रोजी झाली. देशासह जगभरातील भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभात स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने कोट्यवधि भाविकांसाठी मोठी व्यवस्था केली होती. मात्र मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत  ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे योगी सरकारच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली योगी आदित्यनाथ यांनी दिली.

महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले ८ कोटी भाविकही घाबरले असते, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.  महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

आयआयएम अधिकारी आणि भारतीय टपाल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला योगी आदित्यनाथ बोलत होते. "आम्ही या घटनेची जास्त प्रसिद्धी होऊ दिली नाही, कारण त्यावेळी प्रयागराज आणि कुंभमेळा परिसरात आठ कोटी भाविक आणि संत उपस्थित होते आणि अराजकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकली असती. चेंगराचेंगरीची घटना २९ जानेवारीच्या रात्री १:१५ ते १:३० च्या दरम्यान घडली. त्यावेळी कुंभमेळा परिसरात सुमारे ४ कोटी लोकांची गर्दी होती. चेंगराचेंगरी होताच, जखमींना १५ मिनिटांत रुग्णालयात नेण्यात आले, असं योगींनी म्हटलं.

"लाखो भाविकांसोबतच १३ आखाड्यातील संतही त्या दिवशी सकाळी अमृतस्नानासाठी सहभागी होणार होते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनावेळी दोन प्रमुख समस्या अनेकदा उद्भवतात. एक म्हणजे संतांच्या आंघोळीचा क्रम ठरवणे आणि दुसरे म्हणजे पहाटे ४ वाजता विधी सुरळीतपणे पार पडेल याची खात्री करणे. चेंगराचेंगरीची ही घटना घडल्यामुळे सर्व आखाडे स्नानासाठी तयार असतानाही प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्या स्नानाचा कार्यक्रम पुढे ढकलला. परिस्थिती हाताळण्यासाठी मी त्यांना स्वतःहून विधी पुढे ढकलण्याची विनंती केली होती,"

"चेंगराचेंगरीनंतर अधिकाऱ्यांनी गर्दीवर बारीक लक्ष ठेवले. त्यानंतर संगम परिसर दुपारपर्यंत रिकामा केला आणि दुपारी २.३० पासून आंघोळ पुन्हा सुरू होईल याची तयारी केली. अशावेळी कठीण परिस्थितीत अनेक लोक घाबरतात आणि हार मानतात, पण संयम आणि नियंत्रणाने ठोस निर्णय घेण्याची शक्ती आपण विकसित केली पाहिजे," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश