शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

"परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली"; मुख्यमंत्री योगींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:33 IST

प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

MahaKumbh 2025: १४४ वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची सांगता २६ फेब्रुवारी रोजी झाली. देशासह जगभरातील भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभात स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने कोट्यवधि भाविकांसाठी मोठी व्यवस्था केली होती. मात्र मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत  ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे योगी सरकारच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली योगी आदित्यनाथ यांनी दिली.

महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले ८ कोटी भाविकही घाबरले असते, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.  महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

आयआयएम अधिकारी आणि भारतीय टपाल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला योगी आदित्यनाथ बोलत होते. "आम्ही या घटनेची जास्त प्रसिद्धी होऊ दिली नाही, कारण त्यावेळी प्रयागराज आणि कुंभमेळा परिसरात आठ कोटी भाविक आणि संत उपस्थित होते आणि अराजकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकली असती. चेंगराचेंगरीची घटना २९ जानेवारीच्या रात्री १:१५ ते १:३० च्या दरम्यान घडली. त्यावेळी कुंभमेळा परिसरात सुमारे ४ कोटी लोकांची गर्दी होती. चेंगराचेंगरी होताच, जखमींना १५ मिनिटांत रुग्णालयात नेण्यात आले, असं योगींनी म्हटलं.

"लाखो भाविकांसोबतच १३ आखाड्यातील संतही त्या दिवशी सकाळी अमृतस्नानासाठी सहभागी होणार होते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनावेळी दोन प्रमुख समस्या अनेकदा उद्भवतात. एक म्हणजे संतांच्या आंघोळीचा क्रम ठरवणे आणि दुसरे म्हणजे पहाटे ४ वाजता विधी सुरळीतपणे पार पडेल याची खात्री करणे. चेंगराचेंगरीची ही घटना घडल्यामुळे सर्व आखाडे स्नानासाठी तयार असतानाही प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्या स्नानाचा कार्यक्रम पुढे ढकलला. परिस्थिती हाताळण्यासाठी मी त्यांना स्वतःहून विधी पुढे ढकलण्याची विनंती केली होती,"

"चेंगराचेंगरीनंतर अधिकाऱ्यांनी गर्दीवर बारीक लक्ष ठेवले. त्यानंतर संगम परिसर दुपारपर्यंत रिकामा केला आणि दुपारी २.३० पासून आंघोळ पुन्हा सुरू होईल याची तयारी केली. अशावेळी कठीण परिस्थितीत अनेक लोक घाबरतात आणि हार मानतात, पण संयम आणि नियंत्रणाने ठोस निर्णय घेण्याची शक्ती आपण विकसित केली पाहिजे," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश