शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:33 IST

भाजपाचे नेते ब्रजेंद्र सैनी यांनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासमोर रडत रडत आपली व्यथा मांडली.

भाजपाचे नेते ब्रजेंद्र सैनी यांनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासमोर रडत रडत आपली व्यथा मांडली. "त्यांनी आमचं दुकान फोडलं, आम्ही हात जोडले, फक्त पाच मिनिटं मागितली, आमचं सामान काढण्यासाठी फक्त थोडा वेळ द्या, पण या लोकांनी आमचे लाखो रुपये वाया घालवले. जेव्हा आम्ही बाजारातून परतलो तेव्हा आमचा भाऊ खूप अस्वस्थ झाला. आम्ही त्याला खूप समजावून सांगितलं, खूप समजावून सांगितलं..." असं सैनी यांनी म्हटलं. 

सैनी यांच्या भावाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली कारण प्रशासनाने मुरादाबादमध्ये या लोकांच्या दुकानावर बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त केलं होतं. बुलडोझर चालवण्यापूर्वी नोटीस द्यायला हवी होती. मुरादाबादला आलेले उपमुख्यमंत्री पाठक म्हणाले की, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हे प्रकरण माझ्या निदर्शनास आणून दिलं आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. या दुःखद आणि दुर्दैवी घटनेतील कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या दुःखाच्या वेळी सरकार पीडित कुटुंबासोबत उभं आहे.

मुरादाबाद शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे एका भाजपा नेत्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. हे प्रकरण भाजपाचे नेते ब्रजेंद्र सैनी यांचे भाऊ चेतन सैनी यांच्या आत्महत्येचं आहे, जे वडिलांच्या दुकानात बसायचे. प्रशासनाने मंगळवारी पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्यांचे दुकानही अतिक्रमणाच्या कक्षेत आले. दुकानातील सामान काढून टाकण्याची त्यांची विनंती कोणीही ऐकली नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले आणि रात्री छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

कुटुंबात शोककळा पसरली आहे, प्रशासनाच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संपूर्ण परिसरात दुःख आणि संतापाचं वातावरण आहे. कुटुंबाचा दावा आहे की, कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती किंवा कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. दुकानावर थेट बुलडोझर चालवण्यात आला होता. भाजपचे मंडल मंत्री ब्रिजेंद्र सैनी यांनी स्वतः ही संपूर्ण घटना रडत माध्यमांसमोर शेअर केली. त्यांनी सांगितले की, सामान काढण्यासाठी फक्त पाच मिनिटं मागितली होती. पण कोणीही ऐकलं नाही. लाखो रुपयांचं नुकसान झालं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा