शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 08:13 IST

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआम्ही म्हणतो बंगालमध्ये दुर्गा पूजा बॅरोकटोक पद्धतीने व्हायला हवी, त्यामध्ये कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. मग, तुम्ही ही पूजा का थांबवली? हे धार्मिक ध्रुवीकरण नाही का?.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता थोडे दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना चांगलाच वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपने संकल्पपत्र म्हणत जाहीरनामा जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी मेदिनीपूर येथे रोड शो केला. ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकर रिपोर्ट सार्वजनिक करावा, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपाच विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला. (west bengal assembly election 2021 bjp leader amit shah demands that mamata banerjee public her medical report)

पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. भाजपचे संकल्पपत्र संपूर्ण देशात गांभीर्याने घेतले जाते. सोनार बांगलाची संकल्पना घेऊनच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, असे अमित शाह यांनी नमूद केले. तसेच, दै. जागरणला दिलेल्या मुलाखतीत भाजपाकडून धार्मिक धुव्रीकरण होत असल्याच्या आरोपासंदर्भात अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना जनेतच्या मनातील प्रश्न उठवणे म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असेल तर धार्मिक ध्रुवीकरणाची ही नवीन व्याख्या ऐकतोय, असे शहा यांनी म्हटले. 

आम्ही म्हणतो बंगालमध्ये दुर्गा पूजा बॅरोकटोक पद्धतीने व्हायला हवी, त्यामध्ये कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. मग, तुम्ही ही पूजा का थांबवली? हे धार्मिक ध्रुवीकरण नाही का?. आम्ही म्हणतो की, सरस्वती पूजा व्हायला पाहिजे, पण तुम्ही तीही का थांबवली? मग हे ध्रुवीकरण नव्हते का?, असा उलट प्रश्न अमित शहा यांना उपस्थित केला. कुणी रमजान साजरा करावा, आमचा विरोध नाही. कुणी ख्रिसमस साजरा करावा, आमचा विरोध नाही. मात्र, दूर्गा पूजा आणि सरस्वती पूजेवरही बंधनं घालता कामा नये, या पूजाही व्हायलाच हव्या, अशा शब्दात धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रश्नावर अमित शहांनी आपली बाजू स्पष्ट केली.  टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर हिंसा करत असल्याचा आरोप होत आहे, याला कसं उत्तर द्याल असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, जेव्हा एखाद्या राज्यात सरकार बदलणार असते, तेव्हा सर्वात आधी गुंड आणि पोलिसांना त्यांचा अंदाज येतो. त्यामुळे, जेव्हा सरकार बदलणार असते, तेव्हा कोणीही येणाऱ्या सरकारविरुद्ध हिंसात्मक पाऊल उचलत नाही. म्हणूनच, तुम्ही पहा सर्वकाही शांत रितीने सुरू असून ही निवडणूकही शांत पद्धतीनेच होत आहे, असे अमित शहा यांनी म्हटले. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका