शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

"भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, एकत्र येऊन लढायला हवं", ममता बॅनर्जींचं विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 13:48 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधात कणखरपणे उभं राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधात कणखरपणे उभं राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाकडून सर्व केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्र सरकार सूडाचं राजकारण करत असून यासाठी सीबीआय, ईडी, आयबी, आयकर विभागासह सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. लोकशाहीसाठी ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचं बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

भाजपा विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीनं लढायला हवं, असं आवाहन करत बॅनर्जी यांनी विरोधकांच्या सर्वव्यापी बैठकीची मागणी केली आहे. भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन पुढील रणनिती आखायला हवी. त्यावर विचार करायला हवा, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये बीरभूमी हिंसा प्रकरणावरुन राजकीय युद्ध सुरू आहे. यामुळे ममता सरकारला भाजपानं घेरलं आहे. 

भाजपाविरोधात एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीयभाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असून देशाच्या लोकशाहीवर हा हल्लाच असल्याचं बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजपाच्या या सूडाच्या राजकारणाविरोधात एकजुटीनं लढण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्व भाजपा विरोधी पक्ष आणि नेत्यांना माझी विनंती आहे की एका बैठकीचं आयोजन केलं जावं. ज्यात आगामी काळातील रणनितीवर चर्चा केली जाऊ शकेल, असं ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस