शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

देशातील ४०हून अधिक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:52 AM

ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ‘निहाली’या बोलीभाषेचाही यात समावेश आहे.जनगणना संचालनालयाच्या अहवालानुसार प्रत्येकी एक लाख किंवा त्याहून अधिक लोक दैनंदिन व्यवहारात वापर करतात अशा भारतात राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ व परिशिष्टात समावेश नसलेल्या १०० हून अधिक भाषा व बोलीभाषा आहेत.गृह मंत्रालयाच्या अधिकाºयांनुसार यापैकी ४२ भाषा व बोलीभाषांचा दैनंदिन व्यवहारात वापर करणाºयांची संख्या १० हजारांहून कमी असलयने या भाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘युनेस्को’नेही भारतामधील ४२ भाषा नष्ट होण्याचा धोका असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.भाषांच्या संवर्धनाचे म्हैसूरमध्ये कामम्हैसूर येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन लॅग्वेजेस’ मध्येकेंद्र सरकारच्या एका योजनेनुसार नष्टतेच्या मार्गावर असलेल्या भारतीय भाषांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार, अशा भाषांचे व्याकरण, बहुभाषिक शब्दकोश, या भाषांचा लोकसाहित्यांत वापर आणि भाषिक ज्ञानकोष तयार करण्याचे काम तेथे केले जात आहे.नष्ट होण्याचा धोका असलेल्या भाषाग्रेट अंदमानीज, जारवा, लॅमाँंग्से, ल्युरो, मुओत, ओंगे, पु, सानेन्यो, सेंटिलिज, शॉम्पेन आणि ताकाहानयिलांग (अंदमान व निकोबार बेटे), आयमो, आका, कोयरेन, लामगांग, लांगराँग, पुरुम व ताराओ (मणिपूर), बघाती, हांदुरी, पांगवली व सिरमौडी (हिमाचल प्रदेश), मंडा, परजी व पेंगो (ओडिशा), कोराबा आणि कुरुगा (कर्नाटक), गडाबा आणि नाईकी (आंध्र प्रदेश), कोटाव तोडा (तमिळनाडू), म्रा व ना (अरुणाचल प्रदेश), ताई नोरा व ताई रोंग (आसाम), बांगानी (उत्तराखंड), बिरहोर (झारखंड), नि६ाली (महाराष्ट्र), रुगा (मेघालय) आणि तोटो (प. बंगाल).२२ भाषा सर्वाधिक बोलल्या : राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ भाषांखेरीज आणखी ३१भाषांना विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्यभाषेचा दर्जा आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बोलल्या जाणाºया २२ प्रमुख भाषा आहेत. त्याखेरीज अन्य १,६३५ भाषा विविध समाजांच्या मातृभाषा आहेत.