शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

उत्तर प्रदेशातील जखनी गावाची पाणीदार कथा; लोकसहभागातून जलसमृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 04:02 IST

निर्मला देशपांडे यांनी दाखविला मार्ग; बेरोजगारी, स्थलांतरावर केली मात

भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : पद्मविभूषण निर्मला देशपांडे यांनी दाखविलेल्या सर्वोदय परिवाराच्या मार्गावर चालले तर काय होऊ शकते हे उत्तर प्रदेशातील जखनी गावाने दाखवून दिले आहे. सरकारी निधीशिवाय गावाने लोकसहभागातून जलसमृद्धी मिळविली. बेरोजगारी, स्थलांतर, उपासमार यासह अनेक समस्यांवर गावाने मात केली असून, आता याच गावासारखे काम देशभरात साकारण्याचे काम सुरू आहे.बुंदेलखंड परिसरात २००१ ते २००३ या काळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना समजले. जखनी गावचे सामाजिक कार्यकर्ते उमाशंकर पांडे २००५ मध्ये दीदींना भेटायला आले.

दीदींनी त्यांची भेट तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून दिली. ‘तुम्ही तुमचे गाव जलग्राम बनवा’, असे डॉ. कलाम यांनी सांगितले. वनराईचे संस्थापक मोहन धारिया व जलतज्ज्ञ अनुपम मिश्रा यांचीही भेट दीदींनी करून दिली. त्यानंतर पांडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रत्येकाने पाणी बचतीचे काम केल्यास आदर्शवत काम उभे राहील, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकºयाने शेतातच बांध घातले आणि बांधांवर झाडे लावली. तीन वर्षांनंतर त्या बांधांमुळे पावसाचे पाणी शेतातच जिरायला लागले. त्यातून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गावातून स्थलांतर थांबले.

अडीच हजार लोकसंख्येच्या गावाने जलसमृद्धी मिळवली. अडीच हजार क्विंटल बासमती तांदळाचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. रबीच्या हंगामात गहू, हरभरा, तीळ, मूग, उडीद ही पिके घेतली जात आहेत. गावातील भूजल पातळी दहा फुटांवर आली आहे. परिसरातील ग्रामस्थांनीही आता जखनीचा आदर्श घेत काम सुरू केले आहे. दीदींनी दाखविलेल्या मार्गामुळेच आज आम्ही हे करू शकलो. मात्र, आज समृद्धी पाहण्यासाठी त्या हयात नाहीत, असे पांडे सांगतात.निती आयोगाकडून दखलनीती आयोगाने ‘जल व्यवस्थापन २०१९’ या अहवालात गावाची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘मन की बात’मध्ये गावाचे कार्य देशवासीयांना सांगितले. केंद्र सरकारने २०१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशी दोन जलग्राम साकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासारखी अनेक गावे आता जलग्राम होत आहेत.

टॅग्स :Waterपाणी