शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पाण्याचा अपव्यय केल्यास होणार ५ हजार रुपयांचा दंड, चंडीगड महानगरपालिकेने घेतला क्रांतिकारी निर्णय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 10:35 IST

Water Wasting: उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्यापासून अनेक भागांतून दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी चंडीगड महानगरपालिकेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

चंडीगड - उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्यापासून अनेक भागांतून दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी एका महानगरपालिकेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा चंडीगड महानगरपालिकेने केली आहे. या आदेशानुसार जर कुणी पाण्याचा अपव्यय करताना आढळले तर त्याच्यावर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. आजपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे.

उन्हाळा वाढल्याने चंडीगडमध्येही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे चंडीगड महानगरपालिकेकडून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोहीम सुरू केली जात आहे. या मोहिमेंतर्गत चंडीगडमध्ये आजपासून कुणी पाण्याचा आपव्यय केला तर अशा व्यक्तीवर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होणार आहे.

चंडीगड महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी चंडीगड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. हे पथक पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. तसेच पाण्याच्या जोडणीला थेट बुस्टर पंप लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच कुणाच्या छतावरील टाकीमधून पाणी ओतताना दिसले तर त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई