शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 10:45 IST

टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दिल्लीतील जनता पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. पाण्यावरून राजकारण होत आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला कोंडीत पकडत आहेत आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यात उदासीन असल्याचा आरोप करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, दिल्लीतील अनेक भागात टँकर दिसताच लोक पाण्यासाठी मोठी गर्दी करतात. व्हिडीओ पाहून भीषण परिस्थितीचा अंदाज येतो.

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत उष्णतेने होरपळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक आणखी त्रस्त आहेत. उष्णता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा हवामानामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. देशाच्या राजधानीतही पाण्याची टंचाई जाणवत आहे. गीता कॉलनी, वसंत विहार, ओखला अशा अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. येथे टँकर दिसताच लोक तुटून पडत आहेत.

सध्या दिल्लीतील गीता कॉलनी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंकटामुळे स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. याठिकाणी टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिल्लीतील स्थानिक लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे वसंत विहार परिसरातील कुसुमपूर पहाडी येथील लोकांनाही पाणी संकटाचा सामना करावा लागत असून ते टँकरवर अवलंबून दिवस काढत आहेत. येथे टँकर येताच पाण्यासाठी झुंबड उडते.

दिल्लीतील जलसंकटासाठी भाजपाने आम आदमी पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले आहे. विविध भागात भाजपा पुन्हा रस्त्यावर उतरला. खासदार मनोज तिवारी यांनी मुखर्जी नगरमध्ये निदर्शने करत दिल्ली सरकारच्या गलथान कारभारामुळे पाण्याचे संकट असल्याचा आरोप केला. आंदोलकांनी दिल्ली बोर्डाच्या कार्यालयासमोर मडकी फोडून संताप व्यक्त केला.

मनोज तिवारी यांनी जलमंत्री आतिशी यांच्यावर दिल्लीच्या पाण्याबाबत खोटं बोलल्याचा आरोप केला. शहरातील ५५ टक्के पाणी वाया जात असल्याचा दावा करत सरकार टँकर माफियांना पाणी विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे खासदार मनोज तिवारी, बांसुरी स्वराज, रामवीर विधुरी, प्रवीण खंडेलवाल आणि योगेंद्र चंदौलिया यांनी डीजेबीच्या विविध कार्यालयांमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

 

टॅग्स :delhiदिल्लीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात