पावसामुळे जलसंकट टळणार औज बंधारा: पातळी दोन दिवस कायम
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30
सोलापूर :

पावसामुळे जलसंकट टळणार औज बंधारा: पातळी दोन दिवस कायम
स लापूर : दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने औज बंधार्यातील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे उजनीतून पाणी सोडेपर्यंत पाणी कपात करण्याच्या प्रस्तावाला ब्रेक लागला आहे. औज बंधार्यातील पाणीपातळी खाली गेल्याने उजनीतून भीमेत पाणी सोडावे, यासाठी आग्रह वाढला होता. जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत 14 सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचे ठरले आहे. या तारखेला पाणी सोडले तर औज बंधार्यात येण्यासाठी 22 तारीख उजाडणार आहे. पण बंधार्यात 18 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतपत साठा होता. त्यामुळे तीन दिवसांच्या कालावधीसाठी शहरातील पाणी वितरण एक दिवसाने पुढे ढकलण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव होता. याबाबत 7 सप्टेंबर रोजी जलसंपदा मंत्र्यांनी पुण्यात बैठक बोलावली होती. परंतु रविवारी मुख्यमंत्री सोलापूर दौर्यावर आल्याने ही बैठक रद्द झाली. पण उजनीतून पाणी कधी सोडणार, हे अद्यापपर्यंत स्पष्ट न झाल्याने महापालिकेला नियोजन करण्यात अडचण येत होती. अशात पावसाने सोलापूरवरील जलसंकट काहीसे कमी केले आहे. शनिवार व सोमवार अशा दोन दिवसांत औज बंधारा परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रविवारी पाणीपातळी 2. 25 मीटरवर गेली. पाणी उपसा होऊनही ही पातळी स्थिर राहिली. त्यात सोमवारी दुपारी पाऊस झाला. पाणीपातळी 2.30 मीटरवर गेली आहे. अशा प्रकारे पावसाने काहीअंशी सोलापूरकरांना दिलासा दिला आहे. आता बंधार्यातील पाणी 22 तारखेपर्यंत पुरेल अशी आशा आहे. अद्याप ढगाळी हवामान असून, मोठा पाऊस झाल्यास पाणीटंचाईचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. इन्फो..पावसाने उत्सुकता वाढलीसोमवारी शहरात पावसाने हजेरी लावल्यावर सर्वजण सुखावले. उजनी धरण व औज बंधारा परिसरात पाऊस आहे काय अशी सर्वजण विचारणा करू लागले. महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे यांनी उत्सुकतेने पावसाबद्दल माहिती घेतली. औज बंधार्याची स्थिती काय असे जो तो विचारत होता. विशेष म्हणजे राज्य गुप्त वार्ता विभागाकडून पावसाची माहिती घेतली जात होती.