शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

३०० फूट खोल कोळशाच्या खाणीत भरलं पाणी, ९ कामगार अडकले, बचावकार्य सुरू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:14 IST

Assam News: आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ३०० फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरल्याने ९ कामगार अडकले आहेत.

आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ३०० फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरल्याने ९ कामगार अडकले आहेत. मेघालयच्या सीमेजवळ उमरंगसो शहरामध्ये कोळशाची ही बेकायदेशीर खाण आहे. कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्रा या खाणीची अंतर्गत संरचना गुंतागुंतीची असल्याने बचावकार्यामध्ये अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाणीमध्ये सुमारे १०० फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. बचाव कार्यासाठी भारतीय लष्कर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या विशेष पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. सर्व पथकांकडून संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. मात्र पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगारांना वाचवण्यासाठी लष्कराच्या विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. या पथकामध्ये पाणबुडे, इंजिनियर आणि लष्कराच्या इतर प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य एका अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. 

टॅग्स :AssamआसामAccidentअपघात