शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

३०० फूट खोल कोळशाच्या खाणीत भरलं पाणी, ९ कामगार अडकले, बचावकार्य सुरू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:14 IST

Assam News: आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ३०० फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरल्याने ९ कामगार अडकले आहेत.

आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ३०० फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरल्याने ९ कामगार अडकले आहेत. मेघालयच्या सीमेजवळ उमरंगसो शहरामध्ये कोळशाची ही बेकायदेशीर खाण आहे. कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्रा या खाणीची अंतर्गत संरचना गुंतागुंतीची असल्याने बचावकार्यामध्ये अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाणीमध्ये सुमारे १०० फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. बचाव कार्यासाठी भारतीय लष्कर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या विशेष पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. सर्व पथकांकडून संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. मात्र पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगारांना वाचवण्यासाठी लष्कराच्या विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. या पथकामध्ये पाणबुडे, इंजिनियर आणि लष्कराच्या इतर प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य एका अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. 

टॅग्स :AssamआसामAccidentअपघात