शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

थेंब थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान, भारताच्या 'या' निर्णयाचा पाकला बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 16:35 IST

येत्या काही काळात पाकिस्तानला पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तडफडावं लागणार आहे.

नवी दिल्ली- येत्या काही काळात पाकिस्तानला पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तडफडावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)सह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रिसर्च रिपोर्टमधून उघड झालं आहे. रिपोर्टनुसार, 2025पर्यंत पाकिस्तानमध्ये पाण्याशिवाय दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या स्थानिक वर्तमानपत्रांतूनही हे भाकित वर्तवण्यात आलं आहे.पाकिस्तानमधलं ऊर्दू वृत्तपत्र 'जंग'च्या नुसार, जलतज्ज्ञ पाकिस्तानातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यात होणा-या पाण्याच्या तुटवड्यावर लक्ष वेधत आले आहेत. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांमधून मिळणा-या हिश्श्याच्या पाण्याकडे पाकिस्तान लक्ष्य देत नाही आहे. तर पाण्याच्या साठवणुकीसंदर्भात पाकिस्तान बेफिकीर आहे.1990नंतर पाकिस्ताननं पाण्यासंदर्भात कोणतीही योजना आखलेली नाही. तसेच येत्या काळातील पाण्याच्या संकटाकडेही पाकिस्ताननं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तर पाकिस्तानचे स्थानिक वृत्त एक्स्प्रेस लिहितो, जगभरातल्या अनेक भागात पाण्याचा तुटवडा आहे आणि जिकडे पाणी आहे तेसुद्धा प्रदूषित आहे. पाकिस्तानातलं 80 टक्के पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते. त्यातच भारतानं सिंधू पाणी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या अ‍ॅटर्नी जनरल(एजीपी)च्या नेतृत्वातील चार सदस्यांच्या एका प्रतिनिधीमंडळ वॉशिंग्टनला पोहोचले होते. हे प्रतिनिधीमंडळानं किशनगंगा परियोजना आणि दोन्ही देशांमधल्या पाणीकरारावरून जागतिक बँकेशी बैठकही केली होती. तर गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला होता. या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेत धाव घेतली होती. मात्र जागतिक बँकेने या प्रकरणी भारताचा प्रस्ताव स्वीकार करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला होता.पाकिस्तानने किशनगंगा प्रकल्पाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा, असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWaterपाणीWorld Bankवर्ल्ड बँक