शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:00 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं.

प्रयागराज - राहुल गांधी यांनी नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी मला उत्तर प्रदेशात पाठवलं आहे. चौकीदार हे गरिब शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं योग्य मोल मिळत नाही. गेल्या 5 वर्षात देशात बेरोजगारी वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. मायावती यांनी केलेल्या टीकेवरही प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणत्याही भ्रमात नाही,आमची लढाई भारतीय जनता पार्टीविरोधात आहे असं प्रियंका गांधींनी मायावतींना सांगितले. 

यावेळी प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशाचं संविधान संकटात आहे. अनेक वर्ष मी घरात होते. मात्र आता देश संकटात आहे त्यामुळे मला घराबाहेर पडावं लागलं अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर केली. प्रयागराज ते वाराणसी सुरु केलेल्या गंगा यात्रेदरम्यान त्या लोकांशी संवाद साधत होत्या. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही समोर येत नाही मात्र स्वत:च्या उद्योगपती मित्रांसाठी हजारो-करोडो रुपये दिले जातात. दिवसेंदिवस बेरोजगारी देशात वाढत आहे असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.    

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरूवात झाली आहे. ही यात्रा १४0 किलोमीटरची असणार आहे. हनुमान मंदिरात पूजा करुन प्रियंका गांधी यांनी मंदिराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रियंका गांधी अक्षयवट आणि सरस्वती या घाटावर पोहचल्या. त्याठिकाणी प्रियंका यांनी गंगा पूजन केलं. प्रियंका गांधी यांच्या या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्याला 'गंगा जमुना तहजीब यात्रा' असं नाव देण्यात आले आहे. ही यात्रा २० मार्चपर्यंत चालणार असून, आवश्यक त्या ठिकाणी त्या बस व ट्रेनमधूनही प्रवास करणार आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस