शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:00 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं.

प्रयागराज - राहुल गांधी यांनी नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी मला उत्तर प्रदेशात पाठवलं आहे. चौकीदार हे गरिब शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं योग्य मोल मिळत नाही. गेल्या 5 वर्षात देशात बेरोजगारी वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. मायावती यांनी केलेल्या टीकेवरही प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणत्याही भ्रमात नाही,आमची लढाई भारतीय जनता पार्टीविरोधात आहे असं प्रियंका गांधींनी मायावतींना सांगितले. 

यावेळी प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशाचं संविधान संकटात आहे. अनेक वर्ष मी घरात होते. मात्र आता देश संकटात आहे त्यामुळे मला घराबाहेर पडावं लागलं अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर केली. प्रयागराज ते वाराणसी सुरु केलेल्या गंगा यात्रेदरम्यान त्या लोकांशी संवाद साधत होत्या. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही समोर येत नाही मात्र स्वत:च्या उद्योगपती मित्रांसाठी हजारो-करोडो रुपये दिले जातात. दिवसेंदिवस बेरोजगारी देशात वाढत आहे असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.    

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरूवात झाली आहे. ही यात्रा १४0 किलोमीटरची असणार आहे. हनुमान मंदिरात पूजा करुन प्रियंका गांधी यांनी मंदिराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रियंका गांधी अक्षयवट आणि सरस्वती या घाटावर पोहचल्या. त्याठिकाणी प्रियंका यांनी गंगा पूजन केलं. प्रियंका गांधी यांच्या या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्याला 'गंगा जमुना तहजीब यात्रा' असं नाव देण्यात आले आहे. ही यात्रा २० मार्चपर्यंत चालणार असून, आवश्यक त्या ठिकाणी त्या बस व ट्रेनमधूनही प्रवास करणार आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस