शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 07:45 IST

२९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेने एक नव्हे, तर दोन सिग्नल तोडत पुढे असलेल्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर रेल्वेला धडक दिली.

नवी दिल्ली : मागील वर्षी आंध्र प्रदेशच्या विजयनगर जिल्ह्यात झालेला रेल्वेअपघात हा दोन्ही लोको पायलट मोबाइलवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने झाल्याचा धक्कादायक खुलासा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

२९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेने एक नव्हे, तर दोन सिग्नल तोडत पुढे असलेल्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर रेल्वेला धडक दिली. या अपघातात त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. चौकशीत लोको पायलट हे मोबाईलवर मॅच पाहण्यात गुंग होते आणि त्यांनी सिग्नल त्यांनी तोडल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

केवळ ६५ इंजिनमध्ये ‘कवच’ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२२ मध्ये अपघात टाळण्यासाठी रेल्वेइंजिनमध्ये ‘कवच’ प्रणाली बसविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वर्षभरात देशातील १३,२१५ पैकी ६५ इंजिनमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात