शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

CoronaVirus: तिसऱ्या लाटेचा इशारा, तरीही मास्क वापरण्याबाबत दुर्लक्ष; सर्वेक्षणातील निष्कर्ष, तज्ज्ञ चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 10:24 IST

या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांमध्येही मास्क घातलेल्या लोकांचे प्रमाण कमी आढळले.

नवी दिल्ली : देशात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी देऊनही असंख्य लोक मास्क घालताना दिसत नाहीत. लोकल सर्कल्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ६७ टक्के जणांना त्यांच्या भागामध्ये मास्क घातलेले खूपच कमी लोक आढळले.  देशातील ३१२ जिल्ह्यांंमध्ये पार पडलेल्या या सर्वेक्षणात ३३ हजार लोकांची मते अजमाविण्यात आली.

या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांमध्येही मास्क घातलेल्या लोकांचे प्रमाण कमी आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३२ टक्के लोकांनी लसीकरण केंद्रात मोठ्या संख्येने लोकांनी मास्क घातले होते असे निरीक्षण नोंदविले आहे. १८ वर्षे वयावरील सर्वांना मोफत लस देण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे विविध लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असून त्यातील बहुतांश लोक मास्क लावत नाहीत. 

लसीकरण  केंद्रातूनच फैलाव

लसीकरण केंद्रांतूनच आता हा आजार अधिक फैलावू लागल्याने वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता वाटत आहे. भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग व मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कोरोनाच्या डेल्टा प्रकारच्या नव्या विषाणूमुळे दुसरी लाट तीव्र स्वरुपाची झाली.  मास्क परिधान करणे हा उत्तम प्रतिबंधक उपायांपैकी एक आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तरीही असंख्य लोक मास्कविनाच फिरत असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत